शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरमधील पार्किंग समस्येवर धोरण निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: शहरात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अंतर्गत रस्ते अरुंद, त्यातच वाहनांचे होणारे पार्किंग ...

राजगुरुनगर: शहरात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अंतर्गत रस्ते अरुंद, त्यातच वाहनांचे होणारे पार्किंग यांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांतून वारंवार होत होती. अखेर पार्किंग समस्येवर पोलीस प्रशासन आणि राजगुरुनगर परिषदेने तयार केलेल्या धोरणाला प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्ग शहरातून जात असल्याने व महामार्गाच्या दोन्ही बाजूला दुचाकी,चारचाकी वाहने वाटेल त्या पद्धतीने उभी केली जात आहे, त्यामुळे वारंवार वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणात आणणे जिकिरीचे होत आहे. वाहनांच्या रांगा लागत असून पर्यायाने इंधन व वेळेचे नुकसान होत आहे. शहरात शासकीय कार्यालय असल्याने तालुक्यातून येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पार्किंग अस्ताव्यस्तपणे करण्यात आले आणि वाहतूककोंडीत भर पडते. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार आवाज उठवण्यात आला होता. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने सयुक्तरीत्या शहरातील पार्किंग धोरण निश्चित करून त्यासंदर्भातील मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्या प्रस्तावाला आता मंजूर मिळाली आहे.

या धोरणानुसार वाडारोडवर आवश्यकतेनुसार काही भाग पार्किंगसाठी व काही भाग नो-पार्किंगसाठी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच खेड सत्र न्यायालयामागील रस्त्यावर चांडोली येथील नवीन पुलामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे,तसेच न्यायालय,तहसील कार्यालय व इतर महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे तो रस्ता नो-पार्किंग झोन असणार आहे.वाहतूक समस्या निवारणार्थ नो-पार्किंग व पार्किंगचे बोर्ड प्रत्यक्ष स्थळी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, परंतु नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करावी लागेल जेणेकरून वाहतूककोंडी टाळणे सुलभ होईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

हरकती नोंदवण्याचे आवाहन

शहरातील वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणासंदर्भात विविध संघटना,नागरिक यांची मते ही जाणून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणाला काही आक्षेप असल्यास त्यासंदर्भात नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये जाऊन हरकती नोंदव्यात असेही असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.