शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

राजगुरुनगरमधील पार्किंग समस्येवर धोरण निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: शहरात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अंतर्गत रस्ते अरुंद, त्यातच वाहनांचे होणारे पार्किंग ...

राजगुरुनगर: शहरात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अंतर्गत रस्ते अरुंद, त्यातच वाहनांचे होणारे पार्किंग यांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांतून वारंवार होत होती. अखेर पार्किंग समस्येवर पोलीस प्रशासन आणि राजगुरुनगर परिषदेने तयार केलेल्या धोरणाला प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्ग शहरातून जात असल्याने व महामार्गाच्या दोन्ही बाजूला दुचाकी,चारचाकी वाहने वाटेल त्या पद्धतीने उभी केली जात आहे, त्यामुळे वारंवार वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणात आणणे जिकिरीचे होत आहे. वाहनांच्या रांगा लागत असून पर्यायाने इंधन व वेळेचे नुकसान होत आहे. शहरात शासकीय कार्यालय असल्याने तालुक्यातून येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पार्किंग अस्ताव्यस्तपणे करण्यात आले आणि वाहतूककोंडीत भर पडते. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार आवाज उठवण्यात आला होता. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने सयुक्तरीत्या शहरातील पार्किंग धोरण निश्चित करून त्यासंदर्भातील मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्या प्रस्तावाला आता मंजूर मिळाली आहे.

या धोरणानुसार वाडारोडवर आवश्यकतेनुसार काही भाग पार्किंगसाठी व काही भाग नो-पार्किंगसाठी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच खेड सत्र न्यायालयामागील रस्त्यावर चांडोली येथील नवीन पुलामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे,तसेच न्यायालय,तहसील कार्यालय व इतर महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे तो रस्ता नो-पार्किंग झोन असणार आहे.वाहतूक समस्या निवारणार्थ नो-पार्किंग व पार्किंगचे बोर्ड प्रत्यक्ष स्थळी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, परंतु नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करावी लागेल जेणेकरून वाहतूककोंडी टाळणे सुलभ होईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

हरकती नोंदवण्याचे आवाहन

शहरातील वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणासंदर्भात विविध संघटना,नागरिक यांची मते ही जाणून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणाला काही आक्षेप असल्यास त्यासंदर्भात नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये जाऊन हरकती नोंदव्यात असेही असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.