शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

उपाययोजना संदर्भात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव ...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सभापती देवदत्त निकम, विष्णूकाका हिंगे, जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, उपसभापती संतोष भोर, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, शीतल तोडकर, सरपंच किरण राजगुरू, दत्ता थोरात, काँग्रेसचे राजू इनामदार, भाजपचे जयसिंग एरंडे, संजय थोरात, बाळासाहेब बाणखेले, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील पुढे म्हणाले मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द या गावात प्रशासनाने जातीने लक्ष देऊन येथील कोरोनाचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. या परिसरातील बाजार,चौकातील गर्दी, आस्थापनातील गर्दी यासाठी पोलिसांनी लक्ष देऊन काम करावे. प्रत्येक गावात नागरिक शासकीय आदेश पाळतात की नाही यासंदर्भात पाहणी करून त्याचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना द्यावा.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले तालुक्यात सध्या सर्वत्र मोठ्या गावांमध्ये भाजीबाजार, चौकातील गर्दी वाढत चालली आहे. पोलीस प्रशासनाने काळजी घेऊन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांसाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी लसीकरण केले नसेल त्यांचे लसीकरण सर्व कार्यकर्त्यांनी करून घ्यावे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मनापासून काम केले तर तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर त्यांना मिळणाऱ्या कमी मानधनावर काम करण्यास इच्छुक नसून त्यांना शरद बँक व भीमाशंकर कारखान्यामार्फत मानधन देण्याची सूचना करून सध्या तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर व औषधांची कमतरता होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे निदर्शनास आणून दिले. भाजपचे जयसिंग एरंडे म्हणाले सर्वसामान्य गरीब लोकांकडून जास्त पैसे घेतल्याच्या घटना घडत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी. रवींद्र करंजखेले, सुरेश भोर, वसंतराव भालेराव, ताराचंद कराळे, वैभव बाणखेले व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.