शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पोलिसांनी दडपला ओबींसींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ओबीसी आरक्षण बचावसाठी गुरुवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ओबीसी आरक्षण बचावसाठी गुरुवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व नेत्यांनाच पोलिसांनी शनिवारवाड्याजवळ ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यावर नेले. मोर्चाला राजकीय स्वरूप आले, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी प्रदेश अध्यक्षांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.

समीर भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसा नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता. त्यासाठी सगळे कार्यकर्ते शनिवारवाड्याजवळ जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी व अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी भुजबळ यांच्यासह सर्व नेत्यांना तिथेच ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यात आणले.

त्यामुळे शनिवारवाड्याजवळ जमा झालेले आंदोलक गडबडले. उपस्थित पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही, असे सांगत सर्वांना तिथून दूर केले. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणे पसंत केले. दरम्यान फरासखाना पोलिसांनीही नेत्यांना तुम्हाला गाडीतून तिथे नेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे तेही पोलिसांच्या गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले.

तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन दिले. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त असल्याने तिथे जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन दिले. त्यात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करावे अशा मागण्या नमुद केल्या आहेत.

सरकार आमचेच आहे, त्यामुळे आमच्या मागण्यांना नक्की न्याय मिळेल अशी भावना माजी आमदार दीप्ती चवधरी व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले, आम्ही त्यांना सहकार्य केले, आमचे म्हणणे आम्ही सरकारी प्रतिनिधींपर्यंत पोहचवले, असे चाकणकर यांनी सांगितले.

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप आले असल्याची टीका केली. तिथे शरद पवार व राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फलक होते. त्यामुळेच आपण तिथे गेलो नाही. नियोजनाच्या बैठकीत तसे करायचे नाही असे ठरले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही असे त्यांनी सांगितले.