शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

निनावी तक्रारींमुळे पोलीस हैराण

By admin | Updated: November 18, 2015 03:54 IST

निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही

पुणे : निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही कामगिरी खालावत चालली आहे. निनावी आणि खोट्या तक्रारी, खोट्या सहीने केलेल्या तक्रारी आल्यास त्यावर कार्यवाही न करता असे अर्ज दफ्तरी दाखल करण्यात यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र छळवणुकीसाठी या अर्जांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.पोलीस दलामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘नेटवर्क’ला मोठे महत्त्व आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अधिकारी सोडले तर अन्य शहर व जिल्ह्यांमधून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वत:चे नेटवर्क तयार झालेले नसते. खबऱ्यांचे जाळे अधिक घट्ट असल्यास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. पोलिसांचे कान आणि डोळे म्हणजे त्यांचे खबरे. खबऱ्यांशी संपर्क ठेवून माहिती काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यासाठी वरिष्ठांची व सहकारी कर्मचाऱ्यांची नाराजी सोसावी लागते. गुणवत्तेच्या आधारे कामामध्ये आघाडी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र अलीकडच्या काळात निनावी अर्जांद्वारे त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. त्यामुळे काम करणारे कर्मचारीही शांत झाले आहेत. ज्या तक्रारींमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमूद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, अशा तक्रारी दफ्तरी दाखल करून घ्याव्यात. असंबद्ध आरोप असणाऱ्या तक्रारींची तपासणी करण्यात येऊ नये. ज्या तक्रारींमध्ये पडताळणी करता येऊ शकेल असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारींच्या संबंधात प्रशासकीय विभाग अथवा मंत्रालयाने दखल घ्यावी. ही तक्रार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घ्यावी. तक्रारदाराकडून १५ दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास स्मरणपत्र पाठवून आणखी १५ दिवस प्रतीक्षा केल्यानंतरही जर प्रतिसाद न मिळाल्यास ही तक्रार खोट्या नावाने केल्याचे नमूद करावे, असे आदेशात म्हटले आहे. अशा सर्वच अर्जांबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नसून, पडताळणी समर्थनास उपयुक्त अशा प्रसंग अथवा चौकशीयोग्य मुद्यांचा उल्लेख असेल आणि हे मुद्दे सार्वजनिकदृष्ट्या पुरेसे महत्त्वाचे असतील तरच चौकशी करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे. पदोन्नतीच्या काळात असे प्रकार : खात्यांतर्गत स्पर्धेमुळेही प्रकारप्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने निनावी किंवा खोट्या नावाने तक्रारी नाराज झालेल्या व्यक्तींकडून केल्या जातात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याच्या दरम्यान निनावी व खोट्या नावाने तक्रारी केल्या जातात. परिणामी त्यांना पदोन्नती मिळणे अडचणीचे ठरते. यासोबतच त्यांच्या नीतिमूल्यांचे खच्चीकरण केले जाते. असे निनावी अर्ज करणाऱ्याने खरेपणाबद्दलची सही केली पाहिजे. सही येत नसल्यास त्याने अंगठ्याचा ठसा उमटवला पाहिजे, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही खात्यांतर्गत स्पर्धेमधून निनावी व खोटे अर्ज करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.