शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त पासमुळे पीएमपी सुसाट

By admin | Updated: August 17, 2016 01:30 IST

महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ५० रुपयांत दैनंदिन पासच्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ५० रुपयांत दैनंदिन पासच्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ दोनच दिवसांत बसच्या पासधारकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. ओळखपत्राची सक्ती नाही, सुट्या पैशांची झंझट नाही, तिकीट खरेदी केल्यासारखे पास खरेदी करा आणि हव्या त्या ठिकाणी प्रवास करा असे योजनेचे स्वरूप असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.महापालिकेने १४ आॅगस्टपासून ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू केली आहे. हा पास पहाटे ५ पासून मध्यरात्री शेवट बस वेळेपर्यंत वैध आहे . ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू होण्यापूर्वी पासधारकांची संख्या ३५०० इतकी होती सवलतीनंतर पासधारकांच्या संख्या ४ हजार ७०० इतकी वाढ झाली आहे. पासची योजना लागू करण्यापूर्वी पालिकेला पासमधून २ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, सवलतीनंतर हे उत्पन्न ३ लाख ७५ हजार इतके झाले आहे. पासधारकांच्या संख्येत ५०० टक्के इतकी वाढ व्हावी असे उद्दिष्ट पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने ठेवण्यात आले असून त्याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर, सतीश शितोळे, संजय शितोळे, यतीश देवाडिगा यांनी दिली.बसचा प्रवास हा रिक्षापेक्षा महाग पडत होता, त्यामुळे नागरिकांकडून बसऐवजी रिक्षाला प्राधान्य दिले होते. ५० रुपयात पास उपलब्ध होत असल्याने नागरिक पुन्हा बसकडे वळू लागले आहेत. सध्याचे कमी अंतराचे ५० मार्ग वगळता उर्वरित ३००पेक्षा अधिक बस मार्गाचे एकेरी भाडे २५ रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक प्रवासी दिवसभरात त्याच किंवा इतर मार्गावर दोन किंवा अधिक वेळाही प्रवास करतात. ओळखपत्राची सक्ती नसल्याने एका प्रवाशाने पास खरेदी केल्यानंतर तो दुसऱ्याला हस्तांतरित करण्याचीही शक्यता आहे. मात्र पीएमपीकडून हस्तांतरित पासबाबत सूट ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.आयुक्तांनी केला प्रवासपुणे : महापालिकेचे आयुक्त व पुणे महानगर परिवहन मंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष कुणाल कुमार यांनी मंगळवारी बसचा ५० रुपयांचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौक ते सिमला आॅफिसपर्यंत बसमधून जाऊन त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. खुद्द आयुक्त आपल्यासोबत बसमधून प्रवास करीत असल्याचे पाहून प्रवाशांना या वेळी सुखद धक्का बसला. पीएमपीच्या वतीने १४ आॅगस्टपासून ५० रुपयांत बसचा पास ही योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुणाल कुमार यांनी स्वत: बसचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौकातील बसस्टॉपवरून ते बसमध्ये चढले. या वेळी त्यांनी बसमधील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. दररोज बस वेळेवर येते का, बसचा प्रवास कसा वाटतो याची विचारणा त्यांनी प्रवाशांकडे केली. बसच्या कंडक्टर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, जनरल मॅनेजर अनंत वाघमारे उपस्थित होते. नागरिकांनी दुचाकीचा वापर कमी करून पीएमपीकडे जास्त संख्येने वळावे यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात १५०० बस दाखल होणार आहेत. सर्व बसना जीपीएस सिस्टिम बसविण्यात आली आहे. पीएमपीचे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे, त्यामध्ये बस कधी येणार, ती सध्या कुठे आहे याची सविस्तर माहिती मिळणार आहे.