शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल

By admin | Updated: November 23, 2015 00:57 IST

प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत

पुणे : प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच ही प्रणाली तयार होणार असल्याचे ते म्हणाले. प्रवाशांना चालक-वाहक तसेच इतर तक्रारी असल्यास या तक्रारींसाठी काही कार्यालयीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा हे क्रमांक सुटीच्या दिवशी बंद असतात, तर अनेकदा तक्रारी करण्यात येणारे दूरध्वनीच बंद असतात, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने केलेली तक्रार कोणाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. त्याचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नसते, तर आपल्या तक्रारीच पुढे काय झाले, याची साधी कल्पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचा गांभीर्याने सोडविण्यासाठी पीएमपीकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना कृष्णा म्हणाले, की पीएमपी प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या तक्रारींच्या माध्यमातून दैनंदिन संचलन आणि अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सेवा सुरू करणे शक्य आहे. मात्र, अस्तित्वातील प्रणाली परिणामकारक नसल्याने लवकरच नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अ‍ॅप्सही विकसित करण्यात येणार आहे. यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही कृष्णा यांनी स्पष्ट केले.