शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल

By admin | Updated: November 23, 2015 00:57 IST

प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत

पुणे : प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच ही प्रणाली तयार होणार असल्याचे ते म्हणाले. प्रवाशांना चालक-वाहक तसेच इतर तक्रारी असल्यास या तक्रारींसाठी काही कार्यालयीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा हे क्रमांक सुटीच्या दिवशी बंद असतात, तर अनेकदा तक्रारी करण्यात येणारे दूरध्वनीच बंद असतात, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने केलेली तक्रार कोणाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. त्याचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नसते, तर आपल्या तक्रारीच पुढे काय झाले, याची साधी कल्पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचा गांभीर्याने सोडविण्यासाठी पीएमपीकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना कृष्णा म्हणाले, की पीएमपी प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या तक्रारींच्या माध्यमातून दैनंदिन संचलन आणि अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सेवा सुरू करणे शक्य आहे. मात्र, अस्तित्वातील प्रणाली परिणामकारक नसल्याने लवकरच नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अ‍ॅप्सही विकसित करण्यात येणार आहे. यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही कृष्णा यांनी स्पष्ट केले.