शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पीएमपी घेते दर वर्षाला २१ जणांचा बळी

By admin | Updated: August 4, 2014 04:28 IST

चालकांची बेदरकारी आणि खिळखिळ्या झालेल्या पीएमपी बसेसच्या चाकांखाली येऊन - दर वर्षी एकवीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे.

पुणे : चालकांची बेदरकारी आणि खिळखिळ्या झालेल्या पीएमपी बसेसच्या चाकांखाली येऊन - दर वर्षी एकवीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. पीएमपीएमएलची उदासीनता आणि चालकांची बेशिस्त यामुळे निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. साधू वासवानी चौकामध्ये शनिवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे पीएमपी बसमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल १६ जणांचा पीएमपीच्या अपघातात मृत्यू झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या अनेक बसेस नादुरुस्त आहेत. जुन्या झालेल्या नादुरुस्त बसेस तशाच रस्त्यावर दामटवल्या जाताहेत. त्यामुळे या बसेस म्हणजे चालत्या-फिरत्या ‘किलिंग मशिन्स’ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अनेक बसेसना काचा नाहीत, तर काही बसमधून सतत आॅईल गळती होत असते. बसचे ब्रेक सतत गळणाऱ्या आॅईलमुळेही निकामी होण्याचे प्रकार घडतात. शनिवारी तर हडपसर परिसरात एका पीएमपी बसच्या इंजिनमध्ये आग लागली होती. यामध्ये चालक जखमी झाला आहे, तर गुरुवारी सातारा रस्त्यावर झालेल्या पीएमपीच्या अपघातात चालकाच्या बेदरकारीमुळे एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले. गतिरोधक चुकविण्याच्या प्रयत्नांत वेडीवाकडी बस चालवित वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे दरवाजात उभा असलेला प्रवासी खाली पडला. त्याच्या अंगावरून ज्या बसमधून तो प्रवास करीत होता, त्याच बसचे चाक गेले. शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात, तर बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवासी महिलांच्या अंगावरच चालकाने थेट बस घातली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला जखमी झाल्या. पुण्यातल्या रस्त्यांवर पीएमपी बस पाहिली, की पादचारी, वाहनचालकांच्या मनामध्ये धडकीच भरते. या बसचे चालक कधी आणि कुठल्या बाजूला अचानक बस वळवतील, याचा नेम नाही. बसथांबा आला की, अचानक डाव्या बाजूला बस घेतली जाते. त्यामुळे बसच्या शेजारून जाणारे वाहनचालक एका बाजूला दाबले जातात. त्यामुळे गंभीर अपघातांचा धोका संभवतो. गर्दीच्या ठिकाणीही या चालकांची बेदरकारी पाहायला मिळते. त्यामुळे रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच पीएमपीजवळून जावे लागते. गेल्या दोन वर्षांत पीएमपीच्या चाकांखाली येऊन शहरामध्ये चाळीसपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. यातील ४ जणांचा तर चालकाच्या चुकीमुळे बसमधून खाली पडून मृत्यू झालेला आहे. निष्पाप नागरिकांच्या जिवावर उठलेल्या पीएमपीमध्ये सुधारणा आणि चालकांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)