शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

प्लॉटच्या तुकडाबंदीमुळे ‘बजेट’मधील घर महागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

गुंठा-अर्धा गुंठ्यांतील घरांवर मर्यादा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंठेवारीला आळा घालण्यासाठी शासनाने नुकतेच असे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ...

गुंठा-अर्धा गुंठ्यांतील घरांवर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंठेवारीला आळा घालण्यासाठी शासनाने नुकतेच असे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून घरे, फ्लॅट बांधले असतील तर अशा घरांची दस्तनोंदणी करण्यास बंदी घातली आहे. यापुढे अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक राहणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाच्या आदेशानुसार शेतजमिनीच्या हस्तांतरणाचे दस्तऐवज नोंदविताना मुंबई तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ चे नियम ३ नुसार घोषित केलेल्या स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किवा विभागणी, तुकडा निर्माण होईल अशा रीतीने करता येणार नाही, असे बंधन या कायद्याचे कलम ८ अन्वये आहे. या अधिनियमान्वये प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. अशा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे/तुकड्याचे हस्तांतरणाचे दस्त नोंदविताना महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क (आय) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याखेरीज अशा दस्तांची नोंदणी करू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गुंठा-अर्धा गुंठ्यात घरे बांधणे व त्याची अधिकृत नोंदणी करणे पूर्णपणे थांबले आहे.

---------

असा आहे नवा निर्णय

राज्यात तुकडाबंदी कायदा १९४७ पासूनच लागू आहे. परंतु या कायद्यातून पळवाटा काढत लोक एक-अर्धा गुंठा किंवा काही लहान-मोठे बिल्डर गुंठेवारी कायद्याचे उल्लंघन करून घरे बांधून लोकांना विक्री करत होते. अशा बेकायदेशीरपणे व कायद्याचे उल्लंघन करूनदेखील घरांची अधिकृत दस्तनोंदणी होत असल्याने लोक सर्रास अशा पद्धतीने घरांचे बांधकाम करत होते. आता शासनाने महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क (आय) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याखेरीज अश दस्तांची नोंदणी करू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गुंठा-अर्धा गुंठ्यात घरे बांधणे व त्याची अधिकृत नोंदणी करणे पूर्णपणे थांबले आहे.

-----

शासनाने केलेल्या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा गुंठा-अर्धा गुंठा जमिनी घेऊन हक्काचे घर बांधणे किंवा लहान-मोठ्या बिल्डरांना एक-दोन बिल्डिंग उभ्या करून फ्लॅट्सची विक्री करणे कठीण झाले आहे. अशा घरांची दस्तनोंदणीच होणार नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात अशा गुंठेवारीचे एनए करण्यासाठीचा खर्च देखील वाढल्याने घरांच्या किमती वाढणार आहे.

---------

“सध्या आम्ही गुंठे -अर्धा गुंठे जमीन घेऊन हक्काचे घर बांधण्याचा विचार करत होतो. परंतु आता शासनाने अशा गुंठेवारीतील घरांची नोंदच करणे बंद केले आहे. आता गरिबांनी घरे घ्यायची की नाही?”

कुलदीप कौर, गृहिणी