शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

प्लॉटच्या तुकडाबंदीमुळे ‘बजेट’मधील घर महागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

गुंठा-अर्धा गुंठ्यांतील घरांवर मर्यादा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंठेवारीला आळा घालण्यासाठी शासनाने नुकतेच असे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ...

गुंठा-अर्धा गुंठ्यांतील घरांवर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंठेवारीला आळा घालण्यासाठी शासनाने नुकतेच असे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून घरे, फ्लॅट बांधले असतील तर अशा घरांची दस्तनोंदणी करण्यास बंदी घातली आहे. यापुढे अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक राहणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाच्या आदेशानुसार शेतजमिनीच्या हस्तांतरणाचे दस्तऐवज नोंदविताना मुंबई तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ चे नियम ३ नुसार घोषित केलेल्या स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किवा विभागणी, तुकडा निर्माण होईल अशा रीतीने करता येणार नाही, असे बंधन या कायद्याचे कलम ८ अन्वये आहे. या अधिनियमान्वये प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. अशा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे/तुकड्याचे हस्तांतरणाचे दस्त नोंदविताना महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क (आय) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याखेरीज अशा दस्तांची नोंदणी करू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गुंठा-अर्धा गुंठ्यात घरे बांधणे व त्याची अधिकृत नोंदणी करणे पूर्णपणे थांबले आहे.

---------

असा आहे नवा निर्णय

राज्यात तुकडाबंदी कायदा १९४७ पासूनच लागू आहे. परंतु या कायद्यातून पळवाटा काढत लोक एक-अर्धा गुंठा किंवा काही लहान-मोठे बिल्डर गुंठेवारी कायद्याचे उल्लंघन करून घरे बांधून लोकांना विक्री करत होते. अशा बेकायदेशीरपणे व कायद्याचे उल्लंघन करूनदेखील घरांची अधिकृत दस्तनोंदणी होत असल्याने लोक सर्रास अशा पद्धतीने घरांचे बांधकाम करत होते. आता शासनाने महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क (आय) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याखेरीज अश दस्तांची नोंदणी करू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गुंठा-अर्धा गुंठ्यात घरे बांधणे व त्याची अधिकृत नोंदणी करणे पूर्णपणे थांबले आहे.

-----

शासनाने केलेल्या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा गुंठा-अर्धा गुंठा जमिनी घेऊन हक्काचे घर बांधणे किंवा लहान-मोठ्या बिल्डरांना एक-दोन बिल्डिंग उभ्या करून फ्लॅट्सची विक्री करणे कठीण झाले आहे. अशा घरांची दस्तनोंदणीच होणार नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात अशा गुंठेवारीचे एनए करण्यासाठीचा खर्च देखील वाढल्याने घरांच्या किमती वाढणार आहे.

---------

“सध्या आम्ही गुंठे -अर्धा गुंठे जमीन घेऊन हक्काचे घर बांधण्याचा विचार करत होतो. परंतु आता शासनाने अशा गुंठेवारीतील घरांची नोंदच करणे बंद केले आहे. आता गरिबांनी घरे घ्यायची की नाही?”

कुलदीप कौर, गृहिणी