शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित

By admin | Updated: October 13, 2014 00:27 IST

पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यात अतिशय अवघड ठिकाणी वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागा निश्चित झाली आहे.

घोडेगाव : पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यात अतिशय अवघड ठिकाणी वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागा निश्चित झाली आहे. येथील ग्रामस्थांनी अभयारण्य क्षेत्रातील आपली जागा सोडून देण्याचे लेखी पत्रही वनविभागाला दिले आहे. माळीण दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांत दि. १ आॅगस्ट रोजी साखरमाची येथे दरड पडली. दरड पडल्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, या लोकांचा रस्ता बंद झाला, शेतांमध्ये माती साचली. येथील १३ कुटुंबांपैकी ४ कुटुंंबांची घरेही यामध्ये पडली. त्यामुळे हे ग्रामस्थ मुरबाड तालुक्यातील उचल या गावात स्थलांतरित झाले. साखरमाची ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे, अशी मागणी होती. वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी पुणे व ठाणे जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागाही निश्चित झाली आहे. तसेच, ग्रामस्थांनी अभयारण्यात असलेल्या आपल्या जागा सोडून देण्याचे लेखी पत्र तयार करून, वनविभागाला दिले आहे. पुनर्वसन होईपर्यंत दरडीत घरे पडलेल्या चार कुटुंबांसाठी तात्पुरती निवासी शेड बांधून मिळावीत, आदिवासी विकास विभागाने घरकुल योजनेतून घरे द्यावीत, ठाणे जिल्ह्यात रेशनकार्डवर धान्य मिळावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. (वार्ताहर)