शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पिठेवाडी बंधाऱ्याच्या खांबांना भगदाडे

By admin | Updated: May 1, 2017 02:20 IST

पिठेवाडी येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या तीन-चार खांबांना भगदाड पडले आहे. दगड वाहून गेल्याने कमजोर झाल्याने

बावडा : पिठेवाडी येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या तीन-चार खांबांना भगदाड पडले आहे. दगड वाहून गेल्याने कमजोर झाल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंधारा कोरडा पडल्याने शेतातील पिके जळून गेली असून नागरिकांच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नीरा नदीवरील बंधारे वेळेवर अडविण्याचे नियोजन केले असते व भाटघरचे नीरा नदीत सोडलेले पाणी हे सर्व बंधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले असते, तर आजची गंभीर परिस्थितीही शेतकऱ्यांवर आली नसती. तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली नाही तर मात्र आगामी पावसाळ्यात या बंधाऱ्याला आरपार बोगदा पडून पाणी अडणार नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रतापराव पाटील, महादेव शेंडगे, सरपंच संगीता शेंडगे, ज्ञानदेव वाघमोडे, विष्णू वाघमोडे, रामचंद्र पाटील, बापू बंडगर, वसंत शेंडगे, दशरथ कचरे, बापू चोरमले, बापू वाघमोडे, श्रीमंत वाघमोडे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून बंधाऱ्याची पाहणीदरम्यान रविवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पिठेवाडी बंधाऱ्याच्या दुरवस्थेची पाहणी केली. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने खर्चाचा प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यानुसार उद्या सोमवारी जलसंपदाचे अधिकारी जगदाळे अधिकाऱ्यांसह तातडीने बंधाऱ्यास भेट देतील, असे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलताना सांगितले.