शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांची वाढ रोखण्यात पिंपरी महापालिकेला यश

By admin | Updated: December 17, 2014 05:32 IST

औद्योगिकीकरणामुळे महापालिका हद्दीत नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर वाढले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिकांचे लोंढे पिंपरी चिंचवडमध्ये धडकले.

संजय माने, पिंपरीऔद्योगिकीकरणामुळे महापालिका हद्दीत नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर वाढले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिकांचे लोंढे पिंपरी चिंचवडमध्ये धडकले. त्यामध्ये श्रमिक, कष्टकऱ्यांनी झोपडपट्यांचा आश्रय घेतला. झोपडपट्यांच्या वाढीमुळे शहराला बकालपणा येणार नाही, याची दक्षता घेऊन महापालिकेने झोपडपट्टीवासियांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवून नागरीकरणावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. औद्योगिकीकरणाच्या विकासाबरोबर शहराच्या नागरीकरणही झपाट्याने वाढले. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत या शहराच्या वाढीचा वेग अधिक होता. नोकरी व्यवसायानिमित्त राज्याच्या विविध भागातून येऊन या ठिकाणी कायमचे वास्तव्य करणाऱ्यांची संखया वाढली. स्थलांतरितांचे प्रमाण ७२ टक्यावर गेले. रोज कोठे ना कोठे झोपड्या उभ्या राहू लागल्या. परिणामी नागरी सुविधांवरही ताण येऊ लागला. शहराला बकालपणा आणणाऱ्या या झोपड्यांवर आणि गलिच्छ वस्तीत वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर रोखण्यासाठी महापालिकेने वेळीच पावले उचलली. झोपडपट्टी विरहित शहर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे प्रयत्न महापालिकेने केले, त्यामुळे झोपडपट्यांची वाढ रोखण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे. शहरातील झोपडपट्यांची संख्या ७१ वर पोहोचली होती. १९७० ते ८० आणि ८० ते ९० या दोन दशकांत झोपडपट्टी वाढीचा वेग १४ टक्क्यांवर पोहोचला. होता. झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या १ लाख ४३ हजारांवर पोहोचली हाती. ती सद्या चार लाखांहून अधिक आहे. महापालिकेने सुमारे १८ हजार झोपडपट्टीवासियांना पुनर्वसन प्रकल्पात पक्की घरे बांधून दिली आहेत. ओटा स्किम निगडी, विठ्ठलनगर, वेताळनगर, अजंठानगर, उद्यमनगर, मिलिंदनगर, आदर्शनगर, इंदिरानगर आदी झोपडपट्टीतील नागरिकांना पुनर्वसन प्रकल्पापत पक्की घरे मिळाली आहेत. उर्वरित झोपडीधारकांच्या पुनर्वसन प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात झोपडपट्टयांची वाढ नियंत्रणात आली आहे. झोपड्या उभारण्यास महापालिकेने प्रतिबंध केला आहे. झोपडपट्टीवासियांचे फोटोपास हस्तांतरित करणे बंद केले आहे. १ जानेवारी १९९५ नंतरच्या झोपडीधारकांचा पुनर्वसन प्रकल्पासाठी विचार केला जाणार नाही. असे धोरण अवलंबले होते, त्यानंतर २००० पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना पात्र ठरविण्यात आले. त्यानंतर मात्र झोपडपट्टी वाढीला आळा घालण्यात आला. महापालिकेची स्थापना ४ मार्च १९७० मध्ये झाली. त्यानंतर नगरपालिकेचे ‘अ’ वर्गात ७ जानेवारी १९७५ मध्ये रूपांतर झाले. १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या अवघी ८३ हजार ५४२ होती. त्यानंतर १९८१ मध्ये झालेल्या जनगणनेत लोकसंखया २ लाख ४९ हजार ३६४ एवढी झाली. ११ आॅक्टोबर १९८२ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. ११ आॅक्टोबर ८२ ते २६ मार्च १९८६ पर्यंत प्रशासकीय कालखंड होता. १९९१ च्या जनगणनेत शहराची लोकसंख्या ५ लाख १७ हजार ८३ झाली. १९९७ मध्ये नवीन १७ गावे समाविष्ट झाल्याने ही लोकसंख्या ६ लाख २४ हजार ७५९ वर पोहोचली. २००१ च्या जनगणनेत १० लाख ६४ हजार १७ लोकसंख्या झाली. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १७ लाख २९ हजार २३० वर पोहोचली आहे.