शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतरणाविरोधात याचिका

By admin | Updated: May 8, 2017 03:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही पळवाट असून त्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंंनिस) आणि महाराष्ट्र नशाबंदी मंडळ न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.अंनिस आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘नशामुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात धोरण आणि कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी रविवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक कार्यालयात झालेल्या या बैठकीस अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोळकर, मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, माधव बावगे, सुशीला मुंडे, प्रशांत पोतदार, अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्यासह व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या ५०० मीटर संदर्भातील निकालानंतर त्यामध्ये पळवाटा काढण्याचा चालू असलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. त्याला रोखण्याची गरज आहे. यांदर्भात बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेकांनी राज्य शासनाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार अंनिस व नशाबंदी मंडळ ही याचिका दाखल करेल. तसेच दिवसभर चाललेल्या या बैठकीत तीन सत्रांमध्ये महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी धोरण तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी दि. १५ जूनपर्यंत विभागनिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.