शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पेशवेकालीन उच्छवास देऊ शकतात ‘जीवन’

By admin | Updated: June 30, 2014 23:40 IST

पावसाने दडी मारल्याने पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर पाणी मिळणार नसल्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

पुणो : पावसाने दडी मारल्याने पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर पाणी मिळणार नसल्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा वापर करण्याकरिता प्रत्येकाचीच शोधमोहीम सुरू झाली आहे. सुमारे 264 वर्षापूर्वी नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता पेशव्यांनी उभारलेली कात्रज ते शनिवारवाडा पाणीपुरवठा यंत्रणा आजही पाणीटंचाईच्या परिस्थितीत पुणोकरांना ‘जीवन’ देऊ शकते. त्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत जलस्रोतांची माहिती संकलित केली आहे. पेशव्यांनी तयार केलेल्या भुयारी दगडी नळ योजनेतील स्रोतांची स्वच्छता करून डागडुजी केल्यास पुणोकरांना मुबलक पाणी मिळणो सहज शक्य आहे. 
 
मंत बाळाजी पेशवे यांच्या पुढाकाराने 1749 मध्ये पुण्यामध्ये पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात आली. कात्रज ते शनिवारवाडा अशी आश्चर्यकारक यंत्रणा आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत सुरूआहे. तर अनेक पुणोकर या ठिकाणचे पाणी वापरत आहेत. जमिनीखाली सुमारे 3क् फुटांवर साकारण्यात आलेली ही यंत्रणा देशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली होती. चुना आणि विटांच्या साहाय्याने 6 फूट उंच, 2.5 फूट रुंद आणि 8 किमीची यंत्रणा उभारली आहे. 
पेशवेकालीन पाणीपुरवठा यंत्रणोचा शोध सुमारे 2क् वर्षापूर्वी लागला. त्याकरिता अभ्यासक श्रीकृष्ण भागवत आणि श्रीराम भागवत यांनी अथक परिश्रम घेतले. आजही ते या यंत्रणोसंदर्भात शोध घेत असून अडचणी आल्यास सोडविण्यास सहकार्य करीत आहेत. पेशव्यांनी उभारलेले हे बंदिस्त भुयार आजही सुस्थितीत आहे. काही वर्षापूर्वी उच्छवासांमध्ये गाळ साचल्याने नागरिकांना पाणी वापरता येत नव्हते. परंतु गाळ स्वच्छ केल्यानंतर पाणी वापरण्यायोग्य झाले आहे. 
महापालिकेने नागरिकांच्या सहकार्याने या यंत्रणोवर आणखी काम केल्यास पाणीटंचाईचे संकट दूर करणो सहज शक्य आहे. कात्रज येथील राजीव गांधी उद्यानापासून सुरू झालेले भुयार लेक टाऊन, स्टेट बँक कॉलनी, बिबवेवाडी, इंदिरानगर, केके मार्केट, सातारा रस्ता, विवेकानंद पुतळा, अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, राजर्षी शाहू सोसायटी, वाळवेकर नगर, शिवदर्शन, मित्र मंडळ कॉलनी, बालभवन, आचार्य अत्रे सभागृह, वाडिया हॉस्पिटल, काळा हौद, बदामी हौद, भाऊ महाराज बोळ, तुळशीबाग, कोतवाल चावडी, फरासखाना, नाना वाडा, शनिवारवाडामार्गे अमृतेश्वर आणि ओंकारेश्वर घाटार्पयत आहे. पाणीपुरवठा यंत्रणोतून येणारे पाणी अनेक ठिकाणी वापरले जात आहे. 
 
बांधकामामुळे उच्छवास 
बंद करण्याचा प्रयत्न
शहर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी नव्या इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बांधकामाच्या वेळी हे उच्छवास बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात पाणी बाहेर आल्याच्या घटनाही घडल्या. परंतु तरीही अनेक ठिकाणचे उच्छवास तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. हे मार्ग खुले केल्यास आसपासच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. 
 
ऐतिहासिक वारसा म्हणून जपायला हवा
सुमारे 264 वर्षापूर्वी नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता पेशव्यांनी उभारलेली कात्रज ते शनिवारवाडा पाणीपुरवठा यंत्रणा आजही सुरू आहे. केवळ महाराष्ट्राकरिता नाही, तर देशासाठी हा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु हे आश्चर्य ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणोकरांनी हा योजनेचे महत्त्व समजून घेत उपयोग करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
आजही मिळतेय पाणी
कात्रज तलाव, स्टेट बँक कॉलनी, इंदिरानगर, केके मार्केट, अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, राजर्षी शाहू सोसायटी, शिवदर्शन, मित्र मंडळ कॉलनी, आचार्य अत्रे सभागृह, काळा हौद, भाऊ महाराज बोळ आदी भागांमध्ये आजही पेशवेकालीन पाणीपुरवठा यंत्रणोतून येणा:या पाण्याचा वापर केला जात आहे.