शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लोकप्रतिनिधींचे अखेर सरकारला साकडे

By admin | Updated: November 20, 2015 02:54 IST

जनी धरणामध्ये १० टीमएसी पाणी सोडण्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्यामुळे

राजगुरुनगर : उजनी धरणामध्ये १० टीमएसी पाणी सोडण्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्यामुळे आता येथील लोकप्रतिनीधींना सरकारच्या दरबारीच न्याय मागण्याची वेळ आली आहे. आमदार सुरेश गोरे यांनी सुनावणी पूर्ण होईपर्यंत शासनाने पाणी सोडू नये, अशी विनंती केली आहे. तसेच, बाबूराव पाचर्णे यांनी उद्या उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नव्याने सुनावणीची मागणी तसेच पुनर्विलोकन सुनावणीही नाकारल्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांचे पाणी उजनीला सोडण्याच्या निर्णयाला प्राधिकरणाला थांबविण्यास आमदार सुरेश गोरे, बाबूराव पाचर्णे आदी याचिकाकर्त्यांना अपयश आले. म्हणून गोरे यांनी आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच मुळशीचे पंचायत समिती सभापती रवींद्र खंदारे यांनीही याचिका दाखल केली होती.त्याबाबत न्यायाधीश ए. एस. ओक आणि न्यायाधीश जी. एस. पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गोरे यांच्या वतीने वकील म्हणून जी. एस. गोडबोले आणि शकुंतला वाडेकर यांनी काम पाहिले. खंडपीठाने कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार देत या याचिकांवरील पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मात्र निश्चित तोडगा निघालेला नाही. प्राधिकरणाच्या निर्णयास स्थगिती नसल्याने प्राधिकरण केव्हाही पाणी सोडू शकते. मात्र न्यायालयात याचिका दाखल असल्याने शासन न्यायालयाच्या निर्णयाची वाटही पाहू शकते. त्यामुळे या प्रश्नी आता अधांतरी स्थिती निर्माण झाली आहे. न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी न्यायालयाचा मान ठेवून सुनावणी पूर्ण होईपर्यंत शासनाने पाणी सोडू नये. शासन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कलम २३ अन्वये या प्रकरणात हस्तक्षेप करू शकते. म्हणून शासनाने त्या कलमानुसार हस्तक्षेप करून पाणी सोडण्याचे थांबवावे अशी मागणी शासनाकडे केली आहे, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले. उजनीला पाणी सोडण्यास आमचा विरोध कायम आहे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)आता न्यायालयात : प्रश्न अधांतरीतचपुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २६ आॅक्टोबर रोजी घेतला होता. त्यामध्ये खेड तालुक्यातील भामा-आसखेड आणि चासकमान या धरणांतून ७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. या निर्णयामुळे खेड तालुक्यात असंतोष पसरला होता आणि त्याविरोधात विविध पक्ष, संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलने छेडली होती. तसेच भामा आसखेडमधून पाणी सोडण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्नही हाणून पाडला होता. पाणी सोडण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याने गोरे यांनी ९ नोव्हेंबरला उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली आणि न्यायालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडणार नाही असे हमीपत्र शासनाकडून घेतले. दरम्यान, प्राधिकरणाने १७ नोव्हेंबर रोजी पुनर्विलोकन करण्यात येत असल्याचे आदेश काढले. आणि याचिकाकर्त्यांना हजर राहण्यास सांगितले. १७ तारखेला सुनावणी होऊन पुन्हा १८ तारखेला सुनावणी झाली. त्यानुसार प्राधिकरणापुढे झालेल्या सुनावणीत पाणी सोडण्याचा निर्णय पक्षपाती असून नव्याने सुनावणी आवश्यक आहे, अशी बाजू मांडली. पण प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे विचारात घेतले नाही आणि सुनावणी नाकारत पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे याचिकाकर्ते आता न्यायालयात गेले आहेत. सरकार वेड्यासारखे वागतेय!याबाबत बाबूराव पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, इथं आमच्या लोकांनाच पाणी राहिलं नाही. पिकं हा विषय तर संपलाच आहे. मात्र, भविष्यात पिण्याचे पाणीही मिळणार नाही. टँकर दिले तरी टँकरला पाणी आणणार कोठून? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही प्राधिकरणापुढे आमचे मत मांडले. मात्र सरकार ते समजूनच घेण्याच्या तयारीत नाही. ते वेड्यासारखं वागतेय अशी संतप्त प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. ममी उद्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. न्यायालयाला आमचे म्हणणे नक्कीच पटेल.