शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांमध्ये रुग्णांचा द्यावा हलका आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, ...

पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासह फ्लूच्या आजारानेही आबालवृद्धांमध्ये डोके वर काढले आहे. आजारातून बरे होण्यासाठी औषधोपचारांइतकेच योग्य आहारालाही महत्त्व असते. त्यामुळे विषाणूजन्य, संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांना हलका आहार द्यावा आणि द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. अनलॉक झाल्यावर रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंक फूड सेवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या, मळमळ, भूक कमी होणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

आहारतज्ज्ञ कस्तुरी भोसले म्हणाल्या, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये ताप येतो, अन्नावरची वासना उडते. उलट्या, मळमळ अशी लक्षणेही दिसतात. या काळात रुग्णांना दिला जाणारा आहार पचायला हलका असावा. फळांचा आहारात समावेश केल्याने ताकद मिळते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही राखले जाते. भाताची पेज, मूग डाळीची खिचडी, कढण, सूप अशा पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांनी तोंडाला चव येते आणि भूक वाढण्यासही मदत होते. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.

------------------

मलेरियाच्या रुग्णांमध्ये थंडी वाजणे, पोटदुखी, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी सफरचंद वाफवून देता येतात. संत्री, मोसंबी, डाळिंबाचा रस दिल्यास अन्नावरची वासना परत येण्यास मदत होते. सध्याच्या हवामानात केळे कफकारक मानले जाते. त्यामुळे डॉक्टरही शक्यतो आजारपणात केळे टाळण्याचा सल्ला देतात. आजारपणात एखादा कप चहा घेण्यास हरकत नाही. कॉफीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच पोषकतत्वेही शोषली जातात.

- डॉ. कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ

-----------------------

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या आहारात शहाळ्याचे पाणी, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या अशा पदार्थांचे सेवन करावे. आजारांमध्ये बी-१२, डी ३ अशा जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झालेली असते. फळांमधून, भाज्यांमधून ही कमतरता भरून निघते. पालक, गाजर, तांबडा भोपळा यांचे सूपही देता येईल.

- डॉ. निशांत चावरे, जनरल फिजिशियन