शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांमध्ये रुग्णांचा द्यावा हलका आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, ...

पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासह फ्लूच्या आजारानेही आबालवृद्धांमध्ये डोके वर काढले आहे. आजारातून बरे होण्यासाठी औषधोपचारांइतकेच योग्य आहारालाही महत्त्व असते. त्यामुळे विषाणूजन्य, संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांना हलका आहार द्यावा आणि द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. अनलॉक झाल्यावर रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंक फूड सेवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या, मळमळ, भूक कमी होणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

आहारतज्ज्ञ कस्तुरी भोसले म्हणाल्या, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये ताप येतो, अन्नावरची वासना उडते. उलट्या, मळमळ अशी लक्षणेही दिसतात. या काळात रुग्णांना दिला जाणारा आहार पचायला हलका असावा. फळांचा आहारात समावेश केल्याने ताकद मिळते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही राखले जाते. भाताची पेज, मूग डाळीची खिचडी, कढण, सूप अशा पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांनी तोंडाला चव येते आणि भूक वाढण्यासही मदत होते. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.

------------------

मलेरियाच्या रुग्णांमध्ये थंडी वाजणे, पोटदुखी, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी सफरचंद वाफवून देता येतात. संत्री, मोसंबी, डाळिंबाचा रस दिल्यास अन्नावरची वासना परत येण्यास मदत होते. सध्याच्या हवामानात केळे कफकारक मानले जाते. त्यामुळे डॉक्टरही शक्यतो आजारपणात केळे टाळण्याचा सल्ला देतात. आजारपणात एखादा कप चहा घेण्यास हरकत नाही. कॉफीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच पोषकतत्वेही शोषली जातात.

- डॉ. कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ

-----------------------

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या आहारात शहाळ्याचे पाणी, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या अशा पदार्थांचे सेवन करावे. आजारांमध्ये बी-१२, डी ३ अशा जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झालेली असते. फळांमधून, भाज्यांमधून ही कमतरता भरून निघते. पालक, गाजर, तांबडा भोपळा यांचे सूपही देता येईल.

- डॉ. निशांत चावरे, जनरल फिजिशियन