शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

किडनी विकाराच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरली ...

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरली जात असताना सामान्य नागरिकांच्या तुलनेत किडनीच्या आजाराच्या रुग्णांनी दुपटीने विशेष काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ हा सल्ला दिला जात आहे.

कोरोनाग्रस्त व्यक्तींमध्ये ७५-८० टक्के प्रमाण सहव्याधी असलेल्या रुग्णांचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यांसारखे आजार असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे पहिल्यापासून सांगितले जात आहे. कोरोना विषाणूचा नवा ‘व्हेरीयंट’ थेट प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे सहव्याधी असलेल्या रुग्णांना झपाट्याने आणि तीव्र संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच किडनीचा विकार असलेले आणि डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे असते.

कोरोना विषाणूचा किडनीवर संसर्ग होतो. त्यामुळे रक्तप्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो व किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. किडनीच्या पेशींमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, असेही एका संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांनी सौम्य लक्षणे जाणवली तरीही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चौकट

कोरोनाचे एकूण रूग्ण - ४ लाख ७४ हजार २९९

बरे झालेले रूग्ण - ४ लाख ६२ हजार ९२९

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - २ हजार ८८८

एकूण मृत्यू - ८ हजार ४८२

चौकट

किडनीचा रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आल्यास

“कोरोनाग्रस्त अथवा संशयित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी. चाचणीचा अहवाल येण्याची वाट न पाहता तातडीने विलग व्हावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरुन न जाता मानसिक स्थिती खंबीर राखावी. स्वतःहून गृह विलगिकरणात राहण्याचा हट्ट धरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील प्रक्रिया पार पाडावी.”

चौकट

“किडनी विकार असलेल्या रुग्णांनी शक्यतो कोरोना होऊ नये, यासाठीच जास्तीत जास्त काळजी घ्यावी. विलंब न करता लवकरात लवकर लसींचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. मधुमेह आणि रक्तदाब संतुलित राहील याची काळजी घ्यावी. संतुलन राखल्यास कोरोना झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असू शकतो. कोरोना झाल्यास पहिले तीन-चार दिवस दुखणे अंगावर काढून नंतर ऑक्सिजन पातळी घसरली की उपचारांसाठी धावाधाव सुरू होते. अशी परिस्थिती उद्भवू देऊ नये. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्टेरॉइड्सचे प्रमाण ठरवू द्यावे. कोरोनामुळे मूळ आजार आणखी बळावला तर डायलिसिस फ्रिक्वेन्सी वाढू शकते. मात्र, योग्य उपचार घेतल्यास फ्रिक्वेन्सी नियंत्रणात राहते. कोरोना झाला तरी डायलिसिसच्या सायकलमध्ये खंड पडू दिला जात नाही.”

- डॉ. अच्युत जोशी, किडनीविकारतज्ज्ञ