शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

By admin | Updated: January 11, 2015 00:50 IST

देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे.

पुणे : देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. त्यासाठी सर्व पक्षांसह राजकारणात गुणात्मक बदल आवश्यक आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांनी सर्व भेद बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विकासाचे राजकारण केल्यास हे परिवर्तन निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार रेणुका चौधरी, खासदार किरण खेर, माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, केंद्रीय युवक कल्याण विभागाचे सचिव राजीव गुप्ता, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, प्रियदर्शनी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष नानिक रुपाणी, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे संस्थापक निमंत्रक राहुल कराड, डॉ. मंगशे कराड विद्यार्थी प्रतिनिधी सानिध्य बाली व ख्याती राजा व्यासपीठावर उपस्थित होते. चौधरी व खेर यांना या प्रसंगी अनुक्रमे गार्गी पुरस्कार व मैत्रेयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडकरी म्हणाले, की आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसते; पण देशाची ध्येयधोरणे ठरविण्यात त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. राजकारण्यांची वागणूक, गैरव्यवहार यांमुळे समाजाचा विश्वास कमी झाला आहे. यात समाजाचा दोष नाही. देशात अनेक समस्या आहेत. त्यांना संधी मानून तरुणांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.भारतात आता पाण्याचा मोठा व्यापार झाला आहे. चांगले राजकारण करायचे असेल, तर पर्यावरणाला महत्त्व द्यायला हवे, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)४छात्र संसदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी अनेक जण घराकडे दुर्लक्ष करतात. व्यवसायात अपयश आले म्हणून राजकारणात येतात. मात्र, जे लोक स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत, त्यांना देश कसा सांभाळता येईल? त्यामुळे तरुणांनी आधी स्वत:ला ओळखावे. आपली जबाबदारी ओळखून राजकारणात प्रवेश करावा.’’४महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नाही. तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे. त्यामुळे महिलांना वगळून देशाचा विकास होऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाल्या.