शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण वाढल्याने पालक चिंतेत; बोर्डाच्या परीक्षा कशा देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:12 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर आल्या ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर आल्या असताना कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, परीक्षा पुढे न ढकलता कोरोनाविषयक नियमावलीचे काटेकोर पालन करून नियोजित कालावधीतच परीक्षा घ्यावात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबामुळे या वर्षी काही महिने परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यास परीक्षा सुरक्षित वातावरणात घ्याव्या लागणार आहेत. परंतु, त्यासाठी शिक्षण विभाग तयार आहे का? असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, सध्या दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हे अद्याप निश्चित झालेले नाही.

---

बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थ्यांनी वर्गात बसूनच दिल्या पाहिजे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल न करता राज्य मंडळाने आरोग्य विषय काळजी घेऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, पालक

--

विद्यार्थी परीक्षेची तयारी मनलावून करत आहेत. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्यास परीक्षेत गैरप्रकार होण्याचा धोका असल्याने ऑफलाईन पद्धतीनेचे परीक्षा घ्यावी.

- मनोहर पुनाळेकर, पालक

---

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बारावीचे विद्यार्थी आवश्यक काळजी घेऊन परीक्षा देऊ शकतात. मात्र, शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याबाबत आवश्यक नियमांचे पालन करावे. तसेच सध्या विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे राज्य मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ नये.

- शीतल हेंद्रे, पालक

---

माझी मुलगी दहावीत असून गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात भीती असली तरी विद्यार्थ्यांचे वर्ष महत्त्वाचे आहे.

- उज्ज्वला जोशी, पालक

---

विद्यार्थी कोरोना काळातही जमेत त्या साधनांचा वापर करून अभ्यास करत आहेत. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच वर्गात न जाता ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला आपली क्षमता लक्षात येईल. परीक्षा पुढे न ढकलाता नियोजित कालावधीतच परीक्षा घ्यावी

- सुदर्शना भोसले, पालक

--

कोरोनामुळे विद्यार्थी घरात बसून कंटाळले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना गांभीर्याने उपस्थिती लावत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलू नयेत. पालकांच्या मनात कोरोनाची भीती असली तरी आवश्यक काळजी घेऊन विद्यार्थी परीक्षा देतील.

मनोज केदारे, पालक

---

दहावीची परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे

बारावीची परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे