शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पालकांनीच व्हावे शिक्षक आणि मित्रही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

पुणे : शाळेत मित्र-मैत्रिणींबरोबर मस्ती...अभ्यास, मैदानी खेळ...एकत्र डबा खाण्यातली मजा ते स्क्रीनच्या चौकटीत बंद झालेले ऑनलाईन शिक्षण...दुरावलेले मित्र-मैत्रिणी आणि ...

पुणे : शाळेत मित्र-मैत्रिणींबरोबर मस्ती...अभ्यास, मैदानी खेळ...एकत्र डबा खाण्यातली मजा ते स्क्रीनच्या चौकटीत बंद झालेले ऑनलाईन शिक्षण...दुरावलेले मित्र-मैत्रिणी आणि शाळा असा अत्यंत अवघड प्रवास मुले गेली दीड वर्ष अनुभवत आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नसणे ही खूप मोठी बाब आहे. त्यातच पहिली ते पाचवीच्या मुलांची चार-पाच तास चालणारी शाळा अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे. या काळात मुलांना सर्वांत जास्त गरज आहे ती पालकांच्या प्रेमळ आधाराची...त्यामुळे पालकांनी शिक्षक, पालक आणि मित्र अशा तिन्ही भूमिका वठवाव्यात, असा उपाय जाणकारांकडून सुचवला जात आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन युनिफॉर्म, नव्या पुस्तकांचा गंध, मित्र-मैत्रिणींची भेट या वातावरणाला मुले मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मुकली आहेत. ऑनलाईन शाळेचे चार-पाच तास, आठ विषयांचा अभ्यास यामुळे प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे वाढलेला स्क्रीन टाईम, तर दुसरीकडे ‘वर्क फ्रॉम होम’च्या मोडमधील पालकांकडे वेळेचा अभाव असा पेच निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका असल्याने तीही काळजी सतावत आहे. मुलांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा, अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी काही ॲक्टिव्हीटी कराव्यात, मुलांच्या आहार आणि व्यायामावर लक्ष द्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काय आहेत मुलांच्या अडचणी?

* ऑनलाईन लेक्चरची वेळ ३५ ते ४० मिनिटांची असते आणि एका वर्गात ३०-४० मुले असतात. त्यामुळे प्रत्येक अडचण ऑनलाईन क्लासमध्ये विचारणे शक्य होत नाही.

* नेटवर्क कनेक्शनच्या समस्येमुळे अडचण निर्माण होते.

* लहान घर असलेल्या मुलांना शाळा सुरू असताना एकात मिळू शकत नाही.

* चार-पाच तासांच्या वेळेत सहा-सात विषय शिकवले जात असल्याने ताण निर्माण होतो.

* आईवडील वर्क फ्रॉम होम करत असतील, घरात कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर मोबाईल कमी वेळेसाठी उपलब्ध होतो.

* जुळी मुले असतील आणि वेगवेगळ्या तुकडीत असतील तर पालकांचा त्रास आणखी वाढतो.

----

--------

लहान मुले यंदाचे संपूर्ण वर्ष घरीच असणार आहेत. मुलांच्या मानसिक विकासामध्ये हा दोन वर्षांचा काळ खूप महत्त्वाचा आहे. पालकांच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात न येणारे बदल मुलांच्या भावविश्वात घडत आहेत. या काळात पालकांनी शिक्षक आणि मित्र होऊन मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे. डिजिटल विश्वात मुले अडकून पडणार नाहीत, याची काळजी पालकांना घ्यावी लागेल.

- डॉ. संजय ललवाणी, बालरोगतज्ज्ञ

-----

ऑनलाईन शिक्षणाचे तास वगळता पालकांनी इतर वेळी मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे. संकटाकडे संधी म्हणून पाहत मुलांना बैठे खेळ, हस्तकला, चित्रकला किंवा इतर एखादा आवडीचा छंद यामध्ये गुंतवून ठेवावे. या काळात संवादाचा पूल बांधला जाणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र बसून जुने फोटो पाहणे, एखादा पदार्थ करणे, बैठे खेळ खेळणे यातून हा पूल आपोआप बांधला जाऊ शकतो.

- निधी पाध्ये, समुपदेशक