शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आठवी प्रवेशाकरिता पालकांची पायपीट

By admin | Updated: June 1, 2017 02:19 IST

बालशिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने समाजातील प्रत्येक घटकांतील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे. शासनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : बालशिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने समाजातील प्रत्येक घटकांतील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे. शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार नवनगर विकास प्राधिकरणाने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या दिघी परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळेकरिता तब्बल दहा भूखंड आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र, दहापैकी एकही आरक्षण ताब्यात घेण्यास पालिका व नवनगर विकास प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने दिघीतील विद्यार्थ्यांची पाटी कोरीच आहे. तर पालिकेची एकमेव सातवीपर्यंतची प्राथमिक शिक्षण देणारी छत्रपती शाहूमहाराज शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांचा सातवीनंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेशाचा मार्ग अजूनही सुटला नसल्याने पाल्यांच्या प्रवेशाकरिता पालकांवर पायपीट करण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. दर वर्षी कोटी रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करणारे शिक्षण मंडळ मात्र सपशेल नापास झाल्याचे बोलले जात असून दिघीत सातवीनंतरच्या शिक्षणाची बोंबाबोंब असल्याचे वास्तव आहे. पालिकेच्या शाळेतून दर वर्षी सातवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाकरिता आठवीच्या प्रवेशाकरिता खासगी संस्थांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खासगी संस्थेत आधीच सातवी उत्तीर्ण असलेल्यांची संख्या पटावर साधारण चाळीस ते पन्नास असल्याने आठवीत सहज प्रवेश मिळणे शक्य नाही. समाविष्ट गावांत शिक्षणाला अच्छे दिन कधी? पालिकेत समाविष्ट झालेल्या मोशी, चऱ्होली, दिघी, बोपखेल या समाविष्ट भागातील नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी या समाविष्ट भागातील तरुण नेतृत्व म्हणून नितीन काळजे यांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. तर या समाविष्ट भागातून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक बहुसंख्येने जनता जनार्दनांनी निवडून दिले आहेत. यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जनतेचा विश्वास व मिळालेली सत्ता यांचा तोल सांभाळत या संधीचे सोने करून समाविष्ट भागातील गावांमध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून गावातील विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशी येथील नागरिकांची भाबडी आशा असली तरी समाविष्ट भागात शिक्षणाची गंगा अवतरून अच्छे दिन येणार किंवा नाही हे येणारा काळच ठरवेल.