पिंपरी : २००९ मधील मावळ लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आझम पानसरे यांनी पराभवाचा वचपा काढला. पूर्वाश्रमीचे मित्र असणारे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या यशात भर टाकली. निकाल लागताच विजयी उमेदवार बारणे यांनी पानसरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. पानसरे यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या. मावळ लोकसभेतून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पानसरे यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेतर्फे गजानन बाबर यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी धनुष्यबाण चालविला होता. परिणामी बाबर विजयी झाले होते. जगतापांची मागील निवडणुकीत मदत झाल्याची कबुलीही शिवसेनेतून बाहेर पडताना बाबर यांनी दिली होती. पराभव पानसरेंच्या जिव्हारी लागला होता. पराभवाला जगतापच कारणीभूत आहेत, असे पानसरे यांनी जाहीरपणे बोलून दाखविले होते. दरम्यान लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजताच पानसरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. व त्यांनी उघडपणे जगताप विरोधी भूमिका घेतली. ज्या बाणामुळे पानसरेंचा घात झाला. त्याच बाणाचा उपयोग करून त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. (प्रतिनिधी)
पानसरे-बारणे यांची भेट
By admin | Updated: May 19, 2014 02:28 IST