शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

पंचनामे ३८७; भरपाई ८३ जणांनाच

By admin | Updated: May 20, 2014 23:38 IST

बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्‍यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.

जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्‍यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. माजी सरपंच नीलेश जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली सरपंच हनुमंत जगताप, माजी सरपंच राहुल आबनावे, रोहिदास जगताप, तुषार कुडले, प्रमोद जगताप, हनुमंत जगताप, कैलास जगताप यांनी काल पुरंदरचे तहशीलदार संजय पाटील तसेच कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांची भेट घेऊन इतर पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे एक निवेदन ही देण्यात आले आहे. मार्च महिन्यात व त्यानंतर ही पुरंदर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांचे फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तहसीलदार आणि कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण तालुक्यात दौरा काढून पाहणी केली होती. संयुक्तपणे पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही केले होते. यात फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. बेलसर येथील सुमारे ३८७ शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यामध्ये डाळिंबाच्या फळबागांचे अधिक नुकसान झाले होते. त्या सर्वांचे पंचनामेही झाले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८३ जणांनाच नुकसान भरपाई मिळाली आहे. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बेलसरचे कृषी सहाय्यक पी. डी. धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र ज्यांचे नुकसान ५० टक्कयांपेक्षा जास्त झाले आहे. त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांचे नुकसान ५० टक्कयापेक्षा कमी असल्यानेच मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)