शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पंचनामे ३८७; भरपाई ८३ जणांनाच

By admin | Updated: May 20, 2014 23:38 IST

बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्‍यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.

जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्‍यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. माजी सरपंच नीलेश जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली सरपंच हनुमंत जगताप, माजी सरपंच राहुल आबनावे, रोहिदास जगताप, तुषार कुडले, प्रमोद जगताप, हनुमंत जगताप, कैलास जगताप यांनी काल पुरंदरचे तहशीलदार संजय पाटील तसेच कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांची भेट घेऊन इतर पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे एक निवेदन ही देण्यात आले आहे. मार्च महिन्यात व त्यानंतर ही पुरंदर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांचे फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तहसीलदार आणि कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण तालुक्यात दौरा काढून पाहणी केली होती. संयुक्तपणे पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही केले होते. यात फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. बेलसर येथील सुमारे ३८७ शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यामध्ये डाळिंबाच्या फळबागांचे अधिक नुकसान झाले होते. त्या सर्वांचे पंचनामेही झाले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८३ जणांनाच नुकसान भरपाई मिळाली आहे. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बेलसरचे कृषी सहाय्यक पी. डी. धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र ज्यांचे नुकसान ५० टक्कयांपेक्षा जास्त झाले आहे. त्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांचे नुकसान ५० टक्कयापेक्षा कमी असल्यानेच मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)