शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पायी वारीला मुकलो; घरी थांबूनच मानसिक वारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ ...

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ शकला नाही. पण यंदा वारीचा आनंद घेता येईल. या आशेत सर्व वारकरी होते. पण यंदाही तो आनंद घेता येणार नाही. पालखी सोहळ्याच्या पायी वारीला मुकलो तरी घरी थांबूनच मानसिक वारी करणार असल्याची भावना युवा कीर्तनकारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात दरवर्षी जुलै महिन्यात ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पालखी सोहळा सुरु होतो. राज्यातून प्रमुख संतांच्या दहा पालख्या विठ्ठलाच्या भेटीस जात असतात. लाखोंच्या संख्येने वारकरी या पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. दोन वर्षांत वारकरी आणि कीर्तनकारांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा कीर्तनकारांनी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्याबरोबरच अनेक संतांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. गाव, शहरात मुक्काम करत सर्व पालख्या आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला जातात. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मानसिक वारीची संकल्पना जाणून घेण्यासाठी युवा कीर्तनकारांशी संवाद साधला.

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे म्हणाले की, पायी वारी अशक्य असली तरी मानसिक वारीचे चिंतन शक्य आहे. महामारीच्या प्रतिबंधामुळे मनस्वी वारीचा संकल्प कीर्तनकारांनी सुरू केला आहे. त्यात पांडुरंगाच्या सेवेचा संकल्प, संत विचारांची जोपासना, हरिनामाचा अखंड उच्चार आणि दुःखित, पीडित लोकांची यथाशक्य सेवा हा मानसिक वारी करण्याचा त्यांचा मानस आहे. संत सखुबाई देहाने घरी होती, पण मनाने पंढरीत होती. पायी पालखी सोहळ्याला मुकल्याचे शल्य आहेच.

ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे म्हणाले, “जगाला समतेचा संदेश देणारा आषाढी वारी सोहळा आहे. पायी वारी रद्द झाली तरी घरी बसून मनाने दररोज दिंडीत चालत आहोत. दिवसभर नामचिंतन, ग्रंथवाचन या पद्धतीने दिनक्रम चालू आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर सर्व साधना केल्या सारखे आहेत. त्यामुळे या वर्षी मानसिक वारी करत आहोत.”

चौकट

“शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे चालत आलेली वारीची उज्ज्वल, तेजस्वी, दिव्य आणि विशुद्ध परंपरा आजतागायत त्याच निर्मल भक्ती हेतूने चालू आहे. वारकरी अत्यंत निष्ठेने वारी करतात. परंतु संपूर्ण जगताचा विचार करून त्यांनी विराट स्वरूपातली वारी अत्यंत मर्यादित स्वरूपात केली. वारकरी पंढरीला जाण्यासाठी रात्रंदिवस तळमळतो. विश्वावरील महामारीचे संकट लवकरात लवकर निवृत्त होऊन पुन्हा हे विश्व आनंद, शांती आणि समाधानाच्या अधिष्ठानावर विराजित व्हावे, ही कृपासिंधु पांडुरंगचरणी प्रार्थना आम्ही मानसिक वारीतून करणार आहोत.”

-ह.भ.प माऊली महाराज काकडे