शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

पायी वारीला मुकलो; घरी थांबूनच मानसिक वारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ ...

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ शकला नाही. पण यंदा वारीचा आनंद घेता येईल. या आशेत सर्व वारकरी होते. पण यंदाही तो आनंद घेता येणार नाही. पालखी सोहळ्याच्या पायी वारीला मुकलो तरी घरी थांबूनच मानसिक वारी करणार असल्याची भावना युवा कीर्तनकारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात दरवर्षी जुलै महिन्यात ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पालखी सोहळा सुरु होतो. राज्यातून प्रमुख संतांच्या दहा पालख्या विठ्ठलाच्या भेटीस जात असतात. लाखोंच्या संख्येने वारकरी या पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. दोन वर्षांत वारकरी आणि कीर्तनकारांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा कीर्तनकारांनी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्याबरोबरच अनेक संतांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. गाव, शहरात मुक्काम करत सर्व पालख्या आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला जातात. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मानसिक वारीची संकल्पना जाणून घेण्यासाठी युवा कीर्तनकारांशी संवाद साधला.

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे म्हणाले की, पायी वारी अशक्य असली तरी मानसिक वारीचे चिंतन शक्य आहे. महामारीच्या प्रतिबंधामुळे मनस्वी वारीचा संकल्प कीर्तनकारांनी सुरू केला आहे. त्यात पांडुरंगाच्या सेवेचा संकल्प, संत विचारांची जोपासना, हरिनामाचा अखंड उच्चार आणि दुःखित, पीडित लोकांची यथाशक्य सेवा हा मानसिक वारी करण्याचा त्यांचा मानस आहे. संत सखुबाई देहाने घरी होती, पण मनाने पंढरीत होती. पायी पालखी सोहळ्याला मुकल्याचे शल्य आहेच.

ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे म्हणाले, “जगाला समतेचा संदेश देणारा आषाढी वारी सोहळा आहे. पायी वारी रद्द झाली तरी घरी बसून मनाने दररोज दिंडीत चालत आहोत. दिवसभर नामचिंतन, ग्रंथवाचन या पद्धतीने दिनक्रम चालू आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर सर्व साधना केल्या सारखे आहेत. त्यामुळे या वर्षी मानसिक वारी करत आहोत.”

चौकट

“शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे चालत आलेली वारीची उज्ज्वल, तेजस्वी, दिव्य आणि विशुद्ध परंपरा आजतागायत त्याच निर्मल भक्ती हेतूने चालू आहे. वारकरी अत्यंत निष्ठेने वारी करतात. परंतु संपूर्ण जगताचा विचार करून त्यांनी विराट स्वरूपातली वारी अत्यंत मर्यादित स्वरूपात केली. वारकरी पंढरीला जाण्यासाठी रात्रंदिवस तळमळतो. विश्वावरील महामारीचे संकट लवकरात लवकर निवृत्त होऊन पुन्हा हे विश्व आनंद, शांती आणि समाधानाच्या अधिष्ठानावर विराजित व्हावे, ही कृपासिंधु पांडुरंगचरणी प्रार्थना आम्ही मानसिक वारीतून करणार आहोत.”

-ह.भ.प माऊली महाराज काकडे