शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

पायी वारीला मुकलो; घरी थांबूनच मानसिक वारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ ...

पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ शकला नाही. पण यंदा वारीचा आनंद घेता येईल. या आशेत सर्व वारकरी होते. पण यंदाही तो आनंद घेता येणार नाही. पालखी सोहळ्याच्या पायी वारीला मुकलो तरी घरी थांबूनच मानसिक वारी करणार असल्याची भावना युवा कीर्तनकारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात दरवर्षी जुलै महिन्यात ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पालखी सोहळा सुरु होतो. राज्यातून प्रमुख संतांच्या दहा पालख्या विठ्ठलाच्या भेटीस जात असतात. लाखोंच्या संख्येने वारकरी या पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. दोन वर्षांत वारकरी आणि कीर्तनकारांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा कीर्तनकारांनी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्याबरोबरच अनेक संतांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. गाव, शहरात मुक्काम करत सर्व पालख्या आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला जातात. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मानसिक वारीची संकल्पना जाणून घेण्यासाठी युवा कीर्तनकारांशी संवाद साधला.

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे म्हणाले की, पायी वारी अशक्य असली तरी मानसिक वारीचे चिंतन शक्य आहे. महामारीच्या प्रतिबंधामुळे मनस्वी वारीचा संकल्प कीर्तनकारांनी सुरू केला आहे. त्यात पांडुरंगाच्या सेवेचा संकल्प, संत विचारांची जोपासना, हरिनामाचा अखंड उच्चार आणि दुःखित, पीडित लोकांची यथाशक्य सेवा हा मानसिक वारी करण्याचा त्यांचा मानस आहे. संत सखुबाई देहाने घरी होती, पण मनाने पंढरीत होती. पायी पालखी सोहळ्याला मुकल्याचे शल्य आहेच.

ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे म्हणाले, “जगाला समतेचा संदेश देणारा आषाढी वारी सोहळा आहे. पायी वारी रद्द झाली तरी घरी बसून मनाने दररोज दिंडीत चालत आहोत. दिवसभर नामचिंतन, ग्रंथवाचन या पद्धतीने दिनक्रम चालू आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर सर्व साधना केल्या सारखे आहेत. त्यामुळे या वर्षी मानसिक वारी करत आहोत.”

चौकट

“शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे चालत आलेली वारीची उज्ज्वल, तेजस्वी, दिव्य आणि विशुद्ध परंपरा आजतागायत त्याच निर्मल भक्ती हेतूने चालू आहे. वारकरी अत्यंत निष्ठेने वारी करतात. परंतु संपूर्ण जगताचा विचार करून त्यांनी विराट स्वरूपातली वारी अत्यंत मर्यादित स्वरूपात केली. वारकरी पंढरीला जाण्यासाठी रात्रंदिवस तळमळतो. विश्वावरील महामारीचे संकट लवकरात लवकर निवृत्त होऊन पुन्हा हे विश्व आनंद, शांती आणि समाधानाच्या अधिष्ठानावर विराजित व्हावे, ही कृपासिंधु पांडुरंगचरणी प्रार्थना आम्ही मानसिक वारीतून करणार आहोत.”

-ह.भ.प माऊली महाराज काकडे