शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गादीवाफ्यांच्या साह्याने भातशेती फायद्याची

By admin | Updated: November 9, 2015 01:39 IST

जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही

डिंभे : जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही, अशी अवस्था या शेतकऱ्यांची असते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेतीही फायदेशीर व कमी कष्टाची ठरू शकते, हे आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील एका शेतकऱ्याने यंदा दाखवून दिले आहे. त्यांनी यंदा ५० गुंठे क्षेत्रात गादीवाफ्यांच्या साह्याने लागवड केली असून सर्व खर्च जाता ३५ हजारापर्यंतचे उत्पन्न हाती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. बाळासाहेब कोळप असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून हा प्रयोग राबविल्याने त्यांची भातशेती कौैतुकाचा विषय झाला आहे. या प्रयोगाला सध्या शेतकरी भेटी देत असून नुकतीच शाश्वत संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांना त्यांची शिवार फेरी घडवून आणली. कर्जत तालुक्यात भातशेतीसाठी सगुणा राईस तंत्रचा (एस.आर.टी) वापर केला जातो. यातून चांगले उत्पन्न मिळते. यंदा कृषी विभागामार्फत याचा वापर करण्याचे आवाहन भात उत्पादकांना केले होते. आंबेगाव तालुक्यातील सुपेधर, गोहे, पोखरी, राजेवाडी, जांभोरी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात अशा पद्धतीने भातलागवडी केल्या. यातील कोळप यांनी सगुणा राईस तंत्रातील गादीवाफ्याचा प्रयोग केला. याला कृषी विभागाने सहकार्य केले. त्यांनी भात लागवड चिखलनी करून न करता गादी वाफ्यांचा वापर केला. यासाठी त्यांना आधी भातरोप वेगळे तयार करावे लागले नाही. लागवडीसाठी खाचरातील चिखलनी करावी लागली नाही अथवा लागवडीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही. उंच गादीवाफे तयार करून भातपेरणी केली. या प्रयोगासाठी त्यांनी सुरूवातीला उन्हाळ्यामध्ये शेतीची नांगरणी करून ५० गुंठ्यांमध्ये साडेचार बाय दीड फूट उंचीचे एकूण १३० बेड तयार करून घेतले. दोन बेडमधील अंतर १ फूट ठेवले. पुढे पावसाळा सुरू होताच २५ सें.मी, या अंतराने बेडवरती ‘मेणक’ निम गरवा या जातीच्या भागाची पेरणी केली. ५० गुंठ्यावरील पेरणीसाठी २० किलो भातबियाणे लागले. १३ ते १५ हजारांपर्यंत खर्च अपेक्षीत असून आता पीक भरघोस असल्याने ३५,००० हजारांचे उत्पन्न हाती पडेल, असे त्यांनी सांगितले.एकदा तयार केलेले बेड पुढील काही वर्षे वापरात येत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी बेड तयार करावे लागत नाहीत. याच बेडवर रब्बी हंगामात हरभरा, वाटाण्यासारखी पीके घेतल्यास पोत सुधारून पुढीलवर्षी भातपिकाला याचा फायदा होतो. कोळप यांनी भातशेतीत राबविलेला हा प्रयोग अतिशय चांगला असल्याने शाश्वत संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील विविध गावातील शेतकऱ्यांनी या शेतीला भेट देवून या शेतीची माहिती घेतली. त्यांनी राबविलेल्या या प्रयोगाची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी आपल्याही शेतात असे प्रयोग राबवावेत हा या पाठीमागाचा उद्देश असल्याचे या संस्थेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.या वेळी कृषी मंडल अधिकारी डी. एन. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बी. एस. इसकांडे, एस. व्ही. आवटे, चासकर, कृृ षी सहायक एस. पी. इंदोरे, एस. एन. बागडे इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)