शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जुन्नर तालुक्यातील पाचकेवस्ती अनेक सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST

जगाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराळ, दुर्गम आदिवासी पट्ट्यात अद्यापपर्यंत रस्तेच तयार करण्यात आले ...

जगाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराळ, दुर्गम आदिवासी पट्ट्यात अद्यापपर्यंत रस्तेच तयार करण्यात आले नाहीत. येथील नागरिकांना स्वातंत्र्योत्तर काळापासून जा-ये करण्यासाठी रस्ताच नाही. नाईलाजाने या वस्तीतील रहिवाशांना सर्वच ऋतूंमध्ये पायपीट करीत अगदीच कसरत करावी लागते. पायवाटेचा वापर करुन फिरावे लागत आहे. तर त्यांना रस्ताच नसल्यामुळे अद्यापपर्यंत विकासकामांपासून व नागरी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

.

जुन्नर तालुक्यातील तळेरान हद्दीतील सुमारे ३० घरांच्या पाचकेवस्तीला अद्यापही जायला यायला रस्ताच नाही. तळेरानच्या प्रमुख रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतर पायवाटेने कसरतच करुनच ये जा करावी लागते. येथे प्रशस्त रस्ता मिळत नसल्यामुळे दैनंदिन सर्व व्यवहार पायवाटेनेच करावे लागतात. दूधदुभते, बाजारहाट वाहतूक, खते, बी बियाणे, शेतमाल वाहतूक डोक्यावर वाहूनच करावी लागते तर शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात पावसाचा धारा डोईवर झेलत व पायाने चिखल तुडवत भर पावसात याच पायवाटेने धोकादायकपणे जा-ये करावी लागते. रस्त्याअभावी या वस्तीवर कोणतेही वाहन पोहोचू शकत नसल्यामुळे येथील नागरिकांना दररोज नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजारी वृध्द व्यक्तीला आजही झोळी करून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करून उपचारासाठी न्यावे लागत आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे कालावधीत येथील रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात न्यायला रस्ताच नसल्यामुळे उपचाराअभावी मरणयातना सहन करण्याची पाळी आता येथील नागरिकांवर आली आहे.

सदर पाचकेवस्तीला अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. हा जुन्नर तालुक्याचा एक अविभाज्य भाग आहे याची कल्पना देखील काही अधिकाऱ्यांना नसावी म्हणून की काय पण येथे शासकीय सोयीसुविधांसोबतच अनेक योजनांचाही अभाव असल्याचे नागरिक सांगत आहेत. खाचखळगे आणि पायवाटचे जणू आमच्या पाचवीलाच पूजन झाल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. उन्हाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्याचे देखील दुर्भिक्ष असते. रस्ताच नाही तर टँकर मागायचा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. शिवकालीन टाक्यांमध्ये साठलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते व तेथील पाणी उन्हाळ्यात संपुष्टात आले की, एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी विनंती करून मागावे लागते. अशी गंभीर अवस्था पिण्याच्या पाण्याची असूनही दररोज मरणयातना सोसत जीवन जगताना येथील प्रचंड प्रमाणात नित्य उद्भवणाऱ्या समस्यांकडे अद्आपही कोणीच लक्ष देत नसल्याचे पोपट कोकाटे, काशीनाथ कोकाटे, रुपाजी कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, विलास पाटील कोकाटे शंतनु जोशी यांनी सांगितले.

तळेरान (ता. जुन्नर) पाचकेवस्ती घरे रस्ते