शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आमची मुले तणावाखाली अभ्यास करतायेत..!

By admin | Updated: May 13, 2016 01:32 IST

मुलांनी वर्षभर बारावी आणि मेडिकल सीईटीचा अभ्यास केला, खासगी क्लासेससाठी हजारो रुपये शुल्क भरून परीक्षेची तयारी केली. मात्र, सीईटी दिल्यानंतर दोन दिवसांनी ही परीक्षाच रद्द केल्याचे समजले.

पुणे: मुलांनी वर्षभर बारावी आणि मेडिकल सीईटीचा अभ्यास केला, खासगी क्लासेससाठी हजारो रुपये शुल्क भरून परीक्षेची तयारी केली. मात्र, सीईटी दिल्यानंतर दोन दिवसांनी ही परीक्षाच रद्द केल्याचे समजले. त्यामुळे मुले प्रचंड तणावाखाली आहेत. पुढील दोन महिन्यांत होईल तेवढा अभ्यासक्रम ते पूर्ण करतील. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या मुलांच्या तुलनेत राज्यातील मुलांना केवळ दोन महिन्यांचा कालावधी देणे न्यायाला धरून नाही. त्यामुळे केंद्र शासनाने याबाबत अध्यादेश काढून मुलांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.नीट परीक्षेबाबत राज्य व केंद्र शासनाचे धोरण स्पष्ट नाही. सीईटी परीक्षा दिल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप आहे. राज्याच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य पद्धतीने मांडणे गरजेचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे जाऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करावा. ‘नीट’मधून राज्यातील विद्यार्थ्यांना यंदा सूट मिळावी याबाबत केंद्राने अध्यादेश काढावा, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.-राजेश टोपे, माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माझा मुलगा शुभंकर आफळे याने वर्षभर सीईटी परीक्षेचा अभ्यास केला. आता त्याला पुन्हा सीईटी परीक्षेची तयारी करावी लागत आहे. मात्र, ‘नीट’शिवाय आता पर्याय नाही, हे त्याला समजून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. शासनाच्या चुका झाल्या हे खरे आहे. शहरी भागातील मुले कसाबसा अभ्यास करतील; मात्र ग्रामीण भागातील मुले अधिक सफर होणार आहेत. - रमा आफळे, पालक विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा दोन महिन्यांत नीट परीक्षा द्यावी लागणे, हा राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. केवळ दोन महिन्यांत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे केंद्राने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.- कृष्णाथ दगडे, पालक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली, त्याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना अचानक सीईटी परीक्षा द्यावी लागते. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे पुण्यातील शेकडो पालकांनी येत्या १४ मे रोजी शनिवारवाड्यावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने पालक म्हणून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत ठोस पावले उचलावीत.- दिलीप शहा, शिक्षणतज्ज्ञ