शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर आमच्यासारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून ...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर आमच्यासारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून सर्व काही पूर्वपदावर आले आहे. परंतु, आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळाली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आम्हाला पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती वाटू लागली आहे ,असे मत व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. आधीच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती भरून काढण्यास वेळ लागणार होता. त्यासाठी अजूनही हे धडपड करत आहेत. आता एक वर्ष होऊनही व्यवसाय सुरळीत चालू झाला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे राहता येत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सरबत, उसाचे गुऱ्हाळ, चांभार, खाद्यपदार्थ गाडी चालवणारे, स्टॉलवरील चहाविक्रेते, चणे-फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना सर्वात जास्त बसला आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच पराराज्यातून पुण्यात व्यवसाय करण्यासाठी ही लोकं येत असतात. लहान व्यवसायातून त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाह सुरू असतो. परंतु, अशा अचानक ओढवलेल्या संकटाने पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जाते. कोरोनाचे सावट अजून असल्याने त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे.

फळ आणि भाजी विक्रेत्या सुरेखा शिंदे म्हणाल्या, मागच्या वर्षी कोरोनामुळे आम्हाला गावी जावे लागले होते. गावी जाऊन राशन भरण्यासाठी आम्हाला कर्ज काढावे लागले. जवळपास सात महिने आर्थिक चणचण भासत होती. त्यामध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. दवाखान्याच्या खर्चही वाढत गेला. आता व्यवसाय सुरू झाला आहे. तरीही महिन्याभराच्या कमाईत ६० टक्के घट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये असेच आमचे म्हणणे आहे.

--

उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण मागच्या वर्षी याच हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. त्यानंतर पावसाळ्याच्या शेवटी सुरुवात झाली. पण आर्थिक भार कमी झालाच नाही. वर्षभरात ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण मागच्या वर्षी तर कर्जाचा डोंगरच उभा राहिला. डिसेंबरपासून व्यवसाय पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे व्यवसाय थंडावला आहे.

- पांडुरंग फडतरे, उसाचा रस विक्रेते

--

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. त्याचा फटका फक्त गरिबांना बसला आहे. तीन महिने अचानक सर्व बंद झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले होते. काही महिन्यांनी सर्व काही सुरू होण्यास सुरुवात झाली. पण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. खाण्याचा प्रश्न सुटून चालत नाही. घरभाडे, लाईट बिल इतर गोष्टीही याच्यावरच अवलंबून असतात. सरकार लॉकडाऊनची भीती दाखवत आहे. असे काही झाले तर जगणे कठीण होईल.

- राजू वरछाये, चांभार

---

संचारबंदीपासून आठ महिने व्यवसाय बंद होता. लाईट बिल, घरभाडे सर्व काही थकीत होते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्वी महिन्याला ८ ते १० हजार रुपये सुटत होते. पण आता ५ हजारही मिळणे अवघड झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने हे घडत आहे. नगरसेवक, राजकीय नेते गरिबांना मदत करतानाचे फोटो टाकतात. पण आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही. सरकारने लॉकडाऊनचा विचारही करू नये.

- ज्ञानेश्वर सुपेकर, लिंबू सरबत विक्रेते