शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

...अन्यथा पुरंदर किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात

By admin | Updated: May 15, 2014 05:23 IST

किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे.

नारायणपूर : किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ल्याचे किल्लेपण जतन करण्याचे काम त्यांनी करावे. या ठिकाणी सर्व सुविधा द्याव्यात, पर्यटकांची अडवणूक त्वरित थांबवावी. आगामी काळात किल्ल्यावरील डागडुजी, रस्ते सुधारले नाही तर आम्हाला हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी देऊन नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर संपूर्ण स्वराज्याची धुरा सांभाळणार्‍या, एकाच वेळी आदिलशाही, मुघल, इंग्रज, फ्रेंच, आणि काही प्रमाणात स्वकियांशी सतत १० वर्षे अविरत झुंज देऊन स्वराज्याचे रक्षण करणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ला (ता. पुरंदर) येथे जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, अशोक टेकवडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, सुजाता दगडे, माणिक झेंडे, डॉ. स्मिता पाटील, सारिका इंगळे, गौरी कुंजीर, अनिता कुदळे, अंजना भोर, ज्योती परिहार, प्रशांत पाटणे, मराठा राजाभाऊ जगताप, रामभाऊ बोरकर उपस्थित होते. सकाळी पुरंदर किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करण्यांत आला. त्यानंतर पंचायत समितीच्या वतीने विविध कार्यक्रम केले. येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्माचा पाळणा म्हणण्यात आला. पुरंदर प्रतिष्टानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले पुरंदरवर त्यांच्या जन्मस्थानी सकाळी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूणाकृती पुतळ्यास जलाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर भव्य मिरवणूक, भंडारा, आणि दिवसभर विविध कार्यक्रम झाले. या ठिकाणी हजारो भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हातून विविध मान्यवर उपस्थित राहिले होते. पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, ग्रामसेवक संघटना पुरंदर, पंचायत समिती पुरंदर, विविध ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली. (वार्ताहर)