शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पुण्यासह सात जिल्ह्यांमध्ये बुधवारी ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या ३ दिवसांत मध्य भारतासह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या ३ दिवसांत मध्य भारतासह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ईशान्य भारत, मध्य भारत व त्याला जोडून असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मराठवाड्यातील अंबड १२०, बिलोली, मांजलगाव, सोनपेठ ५०, लातूर, पाथरी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी मध्य स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात १८ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, घाट परिसरातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.