शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र आळंदीत खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:14 IST

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पुणे-आळंदी रस्त्यावरील देहूफाटा - वाय जंक्शन ते चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या जोमाने ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पुणे-आळंदी रस्त्यावरील देहूफाटा - वाय जंक्शन ते चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या जोमाने फैलावत आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे स्थानिक सर्वसामान्य महिला, तसेच विद्यार्थी मुलींना उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आळंदीकरांकडून केली जात आहे. दरम्यान, सोमवारी (दि.९) सायंकाळी दहा ते पंधरा वेश्याव्यवसाय काढणाऱ्या महिलांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आळंदी - देवाची येथील पुणे - आळंदी रस्त्यावरील देहूफाटा परिसरात विशेषताः विश्रामगृह ते वाय जंक्शन परिसरात सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक महिला तोंडाला स्कार्फ बांधून रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्यांना हात करून इशारे करत आहेत. संबंधित महिला नियमितपणे या रस्त्यावर फिरत असून देहविक्री व्यवसाय करत आहेत. वास्तविक अशा महिलांच्या वागणुकीमुळे इतर सर्वसामान्य महिला ज्या कामानिमित्त बाहेर जातात त्यांनाही उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे.

चाकण चौक येथील नवीन पूल ते देहूफाटा, जुना पुलालगत भागेश्वरी धर्मशाळेसमोरील फुटपाथ, देहूफाटा बसथांबा, विश्रामगृहासमोर, काळे कॉलनीसमोर तसेच चाकण चौक परिसरातील मुख्य रस्त्यांवर या देहविक्री करणाऱ्या महिला सातत्याने फिरत आहे. मात्र, अशा प्रकारामुळे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राचे नाव खराब होत आहे. तर, स्थानिक महिला व मुलींना कामानिमित्त रस्त्यावर येणेही जिकिरीचे झाले आहे. वेश्या समजून स्थानिक महिलांकडे व मुलींकडे ग्राहक विचारणा करत असल्याचे प्रकार घडले असून त्यातून वाद उद्भवल्याची सत्यस्थिती आहे. शहरातील सार्वजनिक हित लक्षात घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.

आळंदी शहर परिसरात, तसेच दिघी हद्दीत सायंकाळनंतर रात्रीच्या चांदण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय बहरू लागला आहे. संबंधित विविध लॉजिंगच्या दर्शनीबाजूला सन्नाटा दिसून येत असला, तरी पडद्याआड खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार भरत आहे. आर्थिकद़ृष्ट्या कमजोर, असहाय्य युवतींचा गैरफायदा घेत त्यांना वाममार्गाला लावण्यात सराईत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हप्तेगिरीला सोकावलेल्या स्थानिक यंत्रणांकडून टोळ्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.