शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

तीर्थक्षेत्र आळंदीत खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:14 IST

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पुणे-आळंदी रस्त्यावरील देहूफाटा - वाय जंक्शन ते चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या जोमाने ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पुणे-आळंदी रस्त्यावरील देहूफाटा - वाय जंक्शन ते चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या जोमाने फैलावत आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे स्थानिक सर्वसामान्य महिला, तसेच विद्यार्थी मुलींना उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आळंदीकरांकडून केली जात आहे. दरम्यान, सोमवारी (दि.९) सायंकाळी दहा ते पंधरा वेश्याव्यवसाय काढणाऱ्या महिलांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आळंदी - देवाची येथील पुणे - आळंदी रस्त्यावरील देहूफाटा परिसरात विशेषताः विश्रामगृह ते वाय जंक्शन परिसरात सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक महिला तोंडाला स्कार्फ बांधून रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्यांना हात करून इशारे करत आहेत. संबंधित महिला नियमितपणे या रस्त्यावर फिरत असून देहविक्री व्यवसाय करत आहेत. वास्तविक अशा महिलांच्या वागणुकीमुळे इतर सर्वसामान्य महिला ज्या कामानिमित्त बाहेर जातात त्यांनाही उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे.

चाकण चौक येथील नवीन पूल ते देहूफाटा, जुना पुलालगत भागेश्वरी धर्मशाळेसमोरील फुटपाथ, देहूफाटा बसथांबा, विश्रामगृहासमोर, काळे कॉलनीसमोर तसेच चाकण चौक परिसरातील मुख्य रस्त्यांवर या देहविक्री करणाऱ्या महिला सातत्याने फिरत आहे. मात्र, अशा प्रकारामुळे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राचे नाव खराब होत आहे. तर, स्थानिक महिला व मुलींना कामानिमित्त रस्त्यावर येणेही जिकिरीचे झाले आहे. वेश्या समजून स्थानिक महिलांकडे व मुलींकडे ग्राहक विचारणा करत असल्याचे प्रकार घडले असून त्यातून वाद उद्भवल्याची सत्यस्थिती आहे. शहरातील सार्वजनिक हित लक्षात घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.

आळंदी शहर परिसरात, तसेच दिघी हद्दीत सायंकाळनंतर रात्रीच्या चांदण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय बहरू लागला आहे. संबंधित विविध लॉजिंगच्या दर्शनीबाजूला सन्नाटा दिसून येत असला, तरी पडद्याआड खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार भरत आहे. आर्थिकद़ृष्ट्या कमजोर, असहाय्य युवतींचा गैरफायदा घेत त्यांना वाममार्गाला लावण्यात सराईत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हप्तेगिरीला सोकावलेल्या स्थानिक यंत्रणांकडून टोळ्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.