शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पालकच मागतात शाळांकडे हमीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी शाळेकडून घेतली जाणार असल्याचे हमीपत्र शाळेने दिले तरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, असा पवित्रा काही पालकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, तरी किती पालक मुलांना शाळेत पाठवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांसाठी प्रसिध्द केलेल्या नियमावलीनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबबातचा अध्यादेश काढला आहे. पालकांनी संमतीपत्र दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

ग्रामीण भागातील पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्यास प्रतिसाद मिळत असला, तरी शहरी भागातील अनेक विद्यार्थी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळेच पुणे शहरातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास आहे.पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळांना पुन्हा पालकांचे संमतीपत्र घ्यावे लागणार आहे. मात्र, अनेक पालक संमतीपत्र लिहून देण्यास तयार नाहीत.

पुणे महापालिकेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, “शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे आठ हजार आहे. दररोज ५० -५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाते. सोमवारी (दि. १८) पालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता नववीचे १ हजार १२०, दहावीचे १ हजार ५१२ तर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात ३६ आणि बारावीच्या वर्गात १६५ विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट

शाळा देतील का हमी?

“आत्ता शाळा सुरू करण्याऐवजी जून महिन्यापासून करता येऊ शकतात. पहिले तीन महिने गेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि त्यानंतर संबंधित वर्षाचा अभ्यासक्रम शिकवण्याचा पर्याय उचित ठरू शकतो. नववी ते बारावीची उपस्थिती पाहता शहरी भागातील पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल’,असे हमीपत्र शाळेनेच लिहून द्यावे अशीही मागणी काही पालकांची आहे.”

-डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,