शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पालकच मागतात शाळांकडे हमीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी शाळेकडून घेतली जाणार असल्याचे हमीपत्र शाळेने दिले तरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, असा पवित्रा काही पालकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, तरी किती पालक मुलांना शाळेत पाठवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांसाठी प्रसिध्द केलेल्या नियमावलीनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबबातचा अध्यादेश काढला आहे. पालकांनी संमतीपत्र दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

ग्रामीण भागातील पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्यास प्रतिसाद मिळत असला, तरी शहरी भागातील अनेक विद्यार्थी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळेच पुणे शहरातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास आहे.पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळांना पुन्हा पालकांचे संमतीपत्र घ्यावे लागणार आहे. मात्र, अनेक पालक संमतीपत्र लिहून देण्यास तयार नाहीत.

पुणे महापालिकेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, “शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे आठ हजार आहे. दररोज ५० -५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाते. सोमवारी (दि. १८) पालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता नववीचे १ हजार १२०, दहावीचे १ हजार ५१२ तर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात ३६ आणि बारावीच्या वर्गात १६५ विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट

शाळा देतील का हमी?

“आत्ता शाळा सुरू करण्याऐवजी जून महिन्यापासून करता येऊ शकतात. पहिले तीन महिने गेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि त्यानंतर संबंधित वर्षाचा अभ्यासक्रम शिकवण्याचा पर्याय उचित ठरू शकतो. नववी ते बारावीची उपस्थिती पाहता शहरी भागातील पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल’,असे हमीपत्र शाळेनेच लिहून द्यावे अशीही मागणी काही पालकांची आहे.”

-डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,