शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

दहा हजारांमध्ये एक जणच करतो अवयवदान - अवयवदानाबाबत जनजागृती वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात अवयवदानासाठी इतर आवश्यक पायाभूत सुविधा चांगल्या असूनही केवळ जनजागृतीच्या अभावामुळे अवयवदानाचे प्रमाण हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात अवयवदानासाठी इतर आवश्यक पायाभूत सुविधा चांगल्या असूनही केवळ जनजागृतीच्या अभावामुळे अवयवदानाचे प्रमाण हे प्राप्तकर्ता आणि दान करणारा हे प्रमाण दहा हजारास एक इतके अत्यल्प आहे. अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्याने हे प्रमाण इतके कमी आहे, असे पुण्यातील ‘रिबर्थ’ या अवयवदाबाबत जनजागृती आणि प्रबोधनाचे काम करणा-या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले, काही दशकांपूर्वी रक्तदानाबाबत ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या, त्या जनजागृतीमुळेच पूर्णपणे दूर झाल्या आहेत. तशाच प्रकारे अवयदानाबाबतही करायला हवे. त्यामुळे संस्थेने रुग्णालयात समुपदेशकाचे काम करण्यापेक्षा जनजागृतीवर काम करण्याचे ठरवून संस्थेची स्थापना २०१५ मध्ये केली.

जनजागृतीमुळे ग्रीफ काउंसेलरचे (मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानासाठी नातेवाईकांची संमती मिळवण्यासाठी समुपदेशन करणारी व्यक्ती) काम सोपे होणार आहे. मेंदूमृत रुग्णाच्या आठ अवयवांचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांत करता येते. भारतात लोकसंख्येचे प्रमाण मोठे असूनही याबाबत अनेक अंधश्रद्धा, मिथके आहेत. पुनर्जन्म संकल्पनेवर विश्वास असलेल्या व्यक्तीने अवयवदान केले तर पुढील जन्मात ते अवयव आपल्याला मिळणार नाहीत, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे प्रबोधन व जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

संस्थेचे सदस्य प्रमोद महाजन यांनी अवयवदान प्रबोधन व जनजागृतीसाठी संपूर्ण भारतभर ३० हजार किमीपेक्षा जास्त प्रवास एकट्याने दुचाकीवर केला आहे. २०१८ ला सुरू केलेला हा प्रवास अजूनही सुरूच आहे. या प्रवासाची नोंद लिमका बुक आॅफ रेकार्डनेही घेतली आहे. व्यक्तीची किंवा मृताच्या नातेवाईकांची इच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांपासूनच याबाबत काम करणे महत्त्वाचे आहे, असे प्रमोद महाजन सांगतात.

सर्वसामान्यांची नेत्रदानाबाबत तयारी असते मात्र अवयवदान किंवा देहदानाबाबत तयारी नसते. अपघातामुळे मेंदूमृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांवर आघात झालेला असतो अशावेळी अवयवदान समजून घेण्याच्या अवस्थेत ते नसतात.

----------------

अवयदानाबाबत जनजागृती करणारे एखादे प्रकरण शालेय पाठ्यपुस्तकात असावे याबाबत संस्थेने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दहावीच्या विज्ञान विषयातील प्रकरणात अवयव प्रत्यारोपण आणि अवयव आणि देहदानाविषयी प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे.