शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षण निरूपयोगी, उपयोग शून्य अन खर्चिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जूनपासून मुलांच्या ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असला तरी हे शिक्षण निरूपयोगी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जूनपासून मुलांच्या ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असला तरी हे शिक्षण निरूपयोगी आणि उपयोग शून्य असल्याचे निरीक्षण अझीम प्रेमजी विद्यापीठाने नोंदविले आहे. प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव शिक्षक आणि विद्यार्थी या दोन घटकांना मिळतो.

अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यास पाहणीतून ही बाब समोर आली आहे. पुरेशी काळजी घेऊन आणि नियमाची काटेकोर अंमलबजावणी करून शाळा त्वरित सुरू करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले.

विद्यापीठाने पाच राज्ये आणि २६ जिल्ह्यांमध्ये ‘मिथ्स ऑफ ऑनलाइन एज्युकेशन’ नावाने अभ्यास पाहणी उपक्रम राबविला. या उपक्रमात दीड हजारच्यावर शाळा आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. ८० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा ऑनलाइन शिक्षणाबाबतचा अनुभव या अभ्यासाद्वारे नोंदविण्यात आला. विद्यापीठाच्या वेबसाइटवर हा अहवाल उपलब्ध आहे.

या पाहणीनुसार ऑनलाइन शिक्षण हे उपयोगशून्य आणि खर्चिक ठरले आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास ऑनलाईन शिक्षणातून होत नसल्याचे मत अनेक शिक्षक आणि पालकांनी नोंदवले. शिक्षण शालेय वर्गातूनच दिले पाहिजे, असे अनेक पालकांच्या लक्षात आले आहे. शिक्षण अनुभवण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेच्या तुलनेत ऑनलाइन शिक्षणाची रचना निरर्थक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

----------------------------------------------

अभ्यास पाहणीतून समोर आलेले निष्कर्ष

*८० टक्के शिक्षक भावनिकदृष्ट्या जोडलेले नाहीत.

*६० टक्के विद्यार्थ्यांकडे कम्प्युटर, इंटरनेट, स्मार्ट फोन या

सुविधांचा अभाव आहे.

* अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढली.

* ७० टक्के पालकांना ऑनलाइन शिक्षण व्यर्थ वाटते. यामुळे विनाकारण खर्च वाढला.

--------

नकारात्मकता नको

“ऑनलाइन शिक्षण हा शाळांसाठीचा पर्याय असू शकत नाही हे जरी खरे असले तरी या शिक्षणामुळे मुलांचे शिक्षण थांबले नाही. कोरोना काळात शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला ही जमेची बाजू आहे. ऑनलाइन शिक्षणाचा लाभ सर्व मुलांना घेता आला नसला तरी किमान जी काही १५ ते २० टक्के मुले आहेत, त्यांना शिक्षण घेता आले. जर शिक्षण प्रक्रिया बंदच राहिली असती तर समाजाने शैक्षणिक संस्थांच्या तोंडात बोटे घातली असती. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता किंवा त्याच्यावर टीका करण्यापेक्षा जे चांगले घडले त्याचा विचार करावा.”

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

-----------------------------------------------