शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

एक-एक दिवस असाच चाललेला आहे. त्या चिमुकल्यांसाठी, जी घरात बसून अत्यंत कंटाळली आहेत. सतत ती खेळण्याचा हट्ट करत आहेत. ...

एक-एक दिवस असाच चाललेला आहे. त्या चिमुकल्यांसाठी, जी घरात बसून अत्यंत कंटाळली आहेत. सतत ती खेळण्याचा हट्ट करत आहेत. बाहेर जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी आसुसलेली आहेत. त्यांच्यासाठी तरी किमान आपण काळजी घ्यावी. रोगाला वाढू देऊ नये. एकाचे चुकीचे वागणे हे इतरांना संकटात घेऊन जात आहे. जे शिक्षण शाळेमध्ये मिळते.

आज सारासार विचार करून बारकाईने पाहिले तर वय वर्षे १४ व त्या वयाच्या आतील मुलांची प्रगती खुंटल्यासारखी वाटत आहे. कुठेतरी या मुलांचे नुकसान होत आहे, हे जाणवत आहे. ऑनलाईन हे ऑनलाईनच आहे. गणितासारख्या विषयांना एवढे प्रभावी वाटत नाही. सध्या डोळ्यांचे विकार वाढत आहेत. हे विकार जर कायमस्वरूपी त्यांच्या नशिबी आले तर उद्या त्यांचे भविष्य काय असेल? यामधून कधीकधी असे निदर्शनास येत आहे की, या मुलांना मोबाईलचे वेड लागले आहे. यातून ती वाममार्गाला लागतात की काय, याचीही भीती वाटत आहे. हे लागलेले वेड त्यांचे संस्कार कुठे तरी पुसत आहे. कुठेतरी यांना भविष्याचा धोका दिसत आहे.

आज या रोगामुळे खेड्यातील, गावातील, डोंगर-दऱ्यांतील, आदिवासी भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. कारण, त्यांच्याकडे महागडे सर्व सुविधा युक्त मोबाईल नाहीत. काही ठिकाणी तर मोबाईल आहेत. पण तिथे रेंजच नाही, अशी परिस्थिती सुद्धा खूप ठिकाणी आहे. ही मुले रेंज येण्यासाठी झाडावरती बसून आपला जीव धोक्यात घालून तर काही मुले डोंगरावरती जाऊन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक मुलांनी आपल्याला मोबाईल पालक घेऊन देत नाहीत म्हणून आपला जीव सुद्धा गमावला आहे. एक ना अनेक समस्यांमुळे या मुलांना शिक्षणाचा फार मोठा फटका बसत आहे. आज मुले लिहायचं विसरत आहेत. वाचन विसरत आहेत. बेरीज-गुणाकारसारख्या सोप्या क्रिया विसरू लागली आहेत. परीक्षा नसल्याने ते किती सुधारलेले आहेत. त्यांचे मूल्यमापन काय आहे हे समजत नाही. परीक्षा होत नसल्याने लिहिण्याची गतीसुद्धा कमी होण्याचा धोका वाटत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा नसल्याने त्यांना कितपत आठवते हेही माहिती होत नाही. त्यांची आठवण क्षमता कमी होण्याचा धोकाही वाढत आहे.

९ वी ते १२ वी या मुलांचे तर अतोनात नुकसान होत आहे. ९ वीकडे १० वीचा पाया, तर ११ वीकडे १२ वीचा पाया म्हणून पाहिले जाते. १० वी व १२ वी वरती मुलांचं पुढील भविष्य अवलंबून राहतं. कित्येक जणांची वेगवेगळी स्वप्नं असतात. ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी आपल्या जिवाचे रान करून स्पर्धेत उतरत असतात. ज्या मुलांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्यांची ही स्वप्नं कोलमडून पडतात. यावेळी ही मुलं अत्यंत भावूक होऊन चिंताग्रस्त होतात. कधी कधी ते टोकाचे पाऊल ही उचलताना दिसतात. या महत्त्वाच्या वर्षातील मुलांना शिक्षकही आवर्जून त्याच्या भविष्याची जाणीव करून देताना सांगत असतात. बाळा सहा महिने अभ्यास कर साठ वर्षे सुखाची होतील. कित्येक पालकांचे सुद्धा आपली मुले कुठे तरी आपल्यापेक्षा वेगळी व्हावी, त्यांचे जीवन आपल्यापेक्षा चांगले असावे या हेतूने ती खूप खर्च करायला सुद्धा मागे पुढे पाहात नाहीत. याचीही आपल्याला कित्येक उदाहरणं देता येतील.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचं शैक्षणिक नुकसान इथून पुढं होऊ न देण्यासाठी, ज्यांच्या घरात शिक्षण घेणारे आहेत त्यांनी व ज्यांच्या घरात सध्या शिक्षणात नाही. परंतु भविष्यात शिक्षणासाठी येऊ शकतात त्याचबरोबर तुमचे कोणीतरी नातेवाईक जे सध्या शाळेत इतर कुठेतरी शिकत आहेत त्यांच्यासाठी कृपया मास्क वापरा, अंतर ठेवून संवाद साधा, स्वतःची व इतरांची काळजी घ्या. तरच आपण या संकटातून मुक्त होऊ. या रोगाबरोबरच भविष्यात काही दिवस, आपल्याला कुठेतरी काळजी घेऊन जगावे लागणार आहे. आपल्या बेजबाबदार वागण्यामुळेच आज कित्येक जणांच्या नोकऱ्या व जीव धोक्यात आलेले आहेत व गेलेले आहेत. आपण कुठेतरी चुकतोय किंवा काळजी घेत नाही हे यावरून स्पष्ट दिसते. शासन काळजी घेईलच!! पण आपण एक सुज्ञ नागरिक, जनता म्हणून खरंच नियम पाळू व लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या चिमुकल्यांचे, मुलांचे शाळेतील व कॉलेजचे जीवन पूर्वीसारखे आनंदीमय चालू होईल यासाठी कटिबद्ध राहून प्रार्थना करूया.

--

शिलरत्न सौदागर बंगाळे

मॉडर्न हायस्कूल,गणेशखिंड, पुणे.