शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कांदा, वाटाणा, गवार, मेथीने खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2015 02:07 IST

पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला

बारामती : पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला अणि फळभाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर राहिले आहेत. मात्र कांदा, गवार, मेथी, वाटाणा यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. पावसाळा सुरू झाला की , बारामतीच्या बागायती भागात मोठ्या प्रमाणात अडसाली ऊस लागवडी केल्या जातात. पावसाने मारलेली दडी व पाण्याच्या कमतरेमुळे भविष्यात ऊस जगविणे मुश्कील होणार आहे. तसेच धरणांमध्येही अल्प पाणीसाठा आहे. तालुक्यातील सर्वच साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवडींमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली आहे. घट झालेल्या क्षेत्रावर येथाल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तरकारी पिकांच्या लागवडी केल्या आहेत. परिणामी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पुढील दोन-तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. मात्र कांदा ६० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो तर मेथीचा एक पेंडी १५ रुपयाला मिळत आहे. आठवडी बाजारात अजून दर वाढले नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परंतु याही महिन्यात पाऊस झाला नाही तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे दर वाढतील असे येथील भाजी विक्रेत्या पुष्पा गदादे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)