शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, दूध रस्त्यावर ओतले

By admin | Updated: May 28, 2016 04:19 IST

पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे

मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे व दूध रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा रास्ता रोको करण्यात आले. बैलगाडा शर्यत सुरू करा, अशा घोषणाही शेतकऱ्यांनी या वेळी दिल्या.दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टिका केली. शेतकरी टिकला, तरच देश चालेल. मात्र, केंद्रातील मोदी व राज्य सरकार हे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. हे सरकार लायक नसून सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी निषेध सभेत दिला. ते म्हणाले, ‘‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारचा दोन वर्षांचा प्रवास पाहिला तर फक्त ठराविक उद्योगपतींना अच्छे दिन आले असून, सर्वसामान्य माणसांचे मात्र कंबरडे मोडले आहे. हे सरकार ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारविरोधात संघर्ष करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी ठेवावी.’’ या वेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग भय्या पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव शरद शिंदे, प्रभाकर बांगर, राहुल पडवळ, संदीप थोरात, राजू बेंडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)राज्याचे मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पद सोडून दिले पाहिजे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करून गुजरात वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.- दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष