शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

देशात उभारणार एक हजार क्रीडा केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहात असावा हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहात असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे तर स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातल्या सुमारे ७०० जिल्ह्यांत सुमारे हजार ‘खेलो इंडिया निपुणता’ केंद्रे उभारण्याची योजना आहे,” असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीत उभारण्यात आलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा’चा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. १८) झाला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुश्मिता जोत्सी, खासदार गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी केंद्राच्या तांत्रिक सुविधांसंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सोबत एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. दरम्यान, राज्यात तीन खेलो इंडिया निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येत असून यातील एक केंद्र पुण्यात आहे.”

चौकट

तेजस्विनी, राही, स्वरुपचा सत्कार

सन २०२१ मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पात्र ठरलेल्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व बॅडमिंटनमध्ये १९ वर्षांखालील गटात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वरुण कपूर यांचा सत्कार या वेळी रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला.

चौकट

९० खेळाडू, ३८ कोटी

ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, “पुण्यातील राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी, सायकलिंग व अँथलिट या क्रीडाप्रकारातील प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण ९० खेळाडूंना प्रशिक्षित केले जाईल. यादरम्यान खेळाडूंचे प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्थेचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत ३८.२ कोटी रुपये असून खेळाडूंच्या निवडीचे काम सध्या सुरू आहे.” आजवर केंद्राकडून शूटिंग रेंजसाठी ३.७० कोटी, स्पोर्ट्स सायन्स सेंटरसाठी १.३० कोटी तर इतर आवर्ती खर्चासाठी २.७५ कोटी दिल्याचे ते म्हणाले.

फोटो ओळ - ‘खेलो इंडिया राज्य निपुणता’ केंद्राचे लोकार्पण केल्यानंतर किरेन रिजिजू यांनी २०२१ च्या टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वरूप उन्हाळकर याचा सत्कार केला.