शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एकीकडे मुबलक पाणी; अर्धा तालुका दुष्काळी

By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST

बारामती तालुक्यातील बागायती भागाचे क्षेत्र भरमसाट पाण्यामुळे नापीक होत आहे. तर, उर्वरित बारामती दुष्काळाच्या छायेत आहे

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील बागायती भागाचे क्षेत्र भरमसाट पाण्यामुळे नापीक होत आहे. तर, उर्वरित बारामती दुष्काळाच्या छायेत आहे. एकाच तालुक्यात ३० टक्के भागात सुकाळ, तर ७० टक्के भागात दुष्काळ असल्याचे परस्परविरोधी चित्र दिसते. ७० टक्के भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच. तर, दिवाळीनंतरच या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. सुपेचे तळे काही दिवसापूर्वी भरण्यात आले होते. यामध्ये सध्या ३० ते ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, वाकीचे धरण गेल्या पाच वर्षांपासूनच भरलेच नाही. याव्यतिरिक्त आता मोढवेचे पुरंदरे तळे, उंबर ओढ्याची ३ तळी, सोमेश्वर मंदिर तळे, मुर्टीचे २ बंधारे, मोरगाव येथील कऱ्हा नदीवरील बंधारा, मोराळेचा बंधारा, करंजेचे वाघजाई तळे, बंधारा, येळेवस्ती तळे, पांडुळे तळे ही सर्व तळी व बंधारे कोरडे ठणठणीत आहेत. गेल्या वर्षी सोमेश्वर मंदिर येथील सोमायाचे तळे पहिल्या पावसातच भरले; मात्र तळे पूर्ण गाळाने भरल्याने पावसाचे सगळे पाणी वाहून गेले. बारामतीच्या जिरायती भागाला ‘जनाई-शिरसाई’चे गाजर दाखविले. जनाई-शिरसाई ही योजना तातपुरती मलमट्टी असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर या भागातील जनतेने पाण्यासाठी संघर्ष पुकारला. त्यांचा हा संघर्ष आजही चालू आहे.