शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

एकीकडे मुबलक पाणी; अर्धा तालुका दुष्काळी

By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST

बारामती तालुक्यातील बागायती भागाचे क्षेत्र भरमसाट पाण्यामुळे नापीक होत आहे. तर, उर्वरित बारामती दुष्काळाच्या छायेत आहे

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील बागायती भागाचे क्षेत्र भरमसाट पाण्यामुळे नापीक होत आहे. तर, उर्वरित बारामती दुष्काळाच्या छायेत आहे. एकाच तालुक्यात ३० टक्के भागात सुकाळ, तर ७० टक्के भागात दुष्काळ असल्याचे परस्परविरोधी चित्र दिसते. ७० टक्के भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच. तर, दिवाळीनंतरच या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. सुपेचे तळे काही दिवसापूर्वी भरण्यात आले होते. यामध्ये सध्या ३० ते ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, वाकीचे धरण गेल्या पाच वर्षांपासूनच भरलेच नाही. याव्यतिरिक्त आता मोढवेचे पुरंदरे तळे, उंबर ओढ्याची ३ तळी, सोमेश्वर मंदिर तळे, मुर्टीचे २ बंधारे, मोरगाव येथील कऱ्हा नदीवरील बंधारा, मोराळेचा बंधारा, करंजेचे वाघजाई तळे, बंधारा, येळेवस्ती तळे, पांडुळे तळे ही सर्व तळी व बंधारे कोरडे ठणठणीत आहेत. गेल्या वर्षी सोमेश्वर मंदिर येथील सोमायाचे तळे पहिल्या पावसातच भरले; मात्र तळे पूर्ण गाळाने भरल्याने पावसाचे सगळे पाणी वाहून गेले. बारामतीच्या जिरायती भागाला ‘जनाई-शिरसाई’चे गाजर दाखविले. जनाई-शिरसाई ही योजना तातपुरती मलमट्टी असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर या भागातील जनतेने पाण्यासाठी संघर्ष पुकारला. त्यांचा हा संघर्ष आजही चालू आहे.