शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

राज्यात साडेबाराशे रयत बाजारांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृषी विभागाच्या वतीने राज्यात सर्व तालुक्यांमध्ये संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कृषी विभागाच्या वतीने राज्यात सर्व तालुक्यांमध्ये संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरू करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल या बाजारांमधून थेट ग्राहकांना मध्यस्थांची दलाली टाळून विक्री करता येईल. यातून शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होणार आहे.

राज्यात असे १२ हजार ६१६ रयत बाजार सुरू झाले आहेत. प्रत्येक तालुक्यात १०० याप्रमाणे संपूर्ण राज्यात ३५ हजार १०० बाजार सुरू करण्यात येणार आहेत. कृषी खात्याच्या आत्मा या विभागाच्या माध्यमातून हे काम होत आहे. तालुक्यातील सार्वजनिक जागा पाहून तिथे हे बाजार सुरू केले जात आहेत. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, प्रशासन यांची परवानगी काढणे, शेतकरी गट तयार तयार करून त्यांना या बाजाराशी जोडून देणे हे समन्वयाचे काम आत्मा करत आहे.

राज्यातील ९१३६ शेतकरी गट व ६०५ शेतकरी उत्पादक कंपन्या यांना आतापर्यंत या रयत बाजाराच्या माध्यमातून थेट ग्राहकांबरोबर जोडून देण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १८ हजार ७५० जागा आत्माने यासाठी प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील १२ हजार ६१६ जागांवर हे बाजार प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. शेतातील भाजीपाल्यासह कोणताही माल शेतकरी थेट जागेवर आणून विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी त्याला कोणतेही भाडे वगैरे द्यावे लागत नाही. शेतकरी गट असेल तर ते त्यांच्यात उपलब्ध मालाचे नियोजन करून या जागेवर विक्री करू शकतात. जागेची स्वच्छता वगैरे जबाबदारी त्यांना सांभाळावी लागते. एरवी माल व्यापाऱ्यांजवळ पडत्या भावाने देऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी ही शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना कृषी विभाग राज्यात राबवत आहे.

कोट --------------

शहरांमध्ये महापालिका, तसेच खासगी व्यक्तींबरोबर चर्चा करून अधिक मोठ्या व सुसज्ज जागा भाडेतत्वावर मिळवण्यात येत आहेत. पुण्यात स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत लवकरच असे ३५ बाजार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यातही शेतकरी गट जोडून घेण्यात येतील. यामध्ये मात्र त्यांना जागेची दुरुस्ती-देखभाल पाहावी लागेल व भाडेही द्यावे लागेल. मात्र, शहरातील ग्राहक असल्याने त्यांना दरही चांगले व तरीही व्यापारी घेतात त्यापेक्षा जास्तच मिळतील.

किसनराव मुळे, संचालक, आत्मा