शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कोरोनाबाधितांचा आकडा १२ एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:11 IST

नारायणगाव : - केंद्राच्या अहवालानुसार १२ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार आहे, नागरिकांनी लॉकडाऊन संकट टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या ...

नारायणगाव : - केंद्राच्या अहवालानुसार १२ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार आहे, नागरिकांनी लॉकडाऊन संकट टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी नारायणगाव येथील संपर्क कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम , इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरीचे अध्यक्ष डॉ. सदानंद राऊत , सभापती विशाल तांबे आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, केंद्राने जाहीर केलेल्या कोरोना संदर्भातील अहवालानुसार रुग्णसंख्या वाढल्यास पुणे जिल्ह्यात ३७६ व्हेंटिलेटरची कमतरता भासेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड रुग्णामध्ये नवीन पद्धतीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या नव्या कोविडची लक्षणे लहान मुले व तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहे. या नवीन कोविडमुळे रुग्णाच्या फुफुसावर जास्त प्रभाव पडतो व रुग्ण अत्यावस्थेत जातो असे नवीन संशोधनात आढळून आले असल्याने सर्व नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

व्यावसायिकांनी मास्कबरोबरच फेसशिल्डचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे. ४५ वयोगटांपुढील सर्वांनी कोरोना लस घ्यावी, लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशा भ्रमात राहून नये, सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाचे नियम पाळावेत असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. १८ वर्षांपुढील युवकांना लस द्यावी अशी केंद्राकडे मागणी केली आहे.

ओझर येथील कोविड सेंटर सुरू होणार

कोविड रुग्णांनी होम आयसोलेशन न राहता कोविड सेंटर अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे . ओझर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार आहे. तालुक्यात ६२० बेडची सुविधा असून २५६ रुग्ण उपचार घेत आहेत अशी डॉ. कोल्हे यांनी दिली.

बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सात्यत्याने आपला प्रयत्न सुरू असून केंद्राकडून त्यामागणी संदर्भात साकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नारायणगाव व खेड बायपास सुरू झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.