शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचा आकडा १२ एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:11 IST

नारायणगाव : - केंद्राच्या अहवालानुसार १२ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार आहे, नागरिकांनी लॉकडाऊन संकट टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या ...

नारायणगाव : - केंद्राच्या अहवालानुसार १२ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार आहे, नागरिकांनी लॉकडाऊन संकट टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी नारायणगाव येथील संपर्क कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम , इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरीचे अध्यक्ष डॉ. सदानंद राऊत , सभापती विशाल तांबे आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, केंद्राने जाहीर केलेल्या कोरोना संदर्भातील अहवालानुसार रुग्णसंख्या वाढल्यास पुणे जिल्ह्यात ३७६ व्हेंटिलेटरची कमतरता भासेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड रुग्णामध्ये नवीन पद्धतीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या नव्या कोविडची लक्षणे लहान मुले व तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहे. या नवीन कोविडमुळे रुग्णाच्या फुफुसावर जास्त प्रभाव पडतो व रुग्ण अत्यावस्थेत जातो असे नवीन संशोधनात आढळून आले असल्याने सर्व नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

व्यावसायिकांनी मास्कबरोबरच फेसशिल्डचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे. ४५ वयोगटांपुढील सर्वांनी कोरोना लस घ्यावी, लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशा भ्रमात राहून नये, सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाचे नियम पाळावेत असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. १८ वर्षांपुढील युवकांना लस द्यावी अशी केंद्राकडे मागणी केली आहे.

ओझर येथील कोविड सेंटर सुरू होणार

कोविड रुग्णांनी होम आयसोलेशन न राहता कोविड सेंटर अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे . ओझर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार आहे. तालुक्यात ६२० बेडची सुविधा असून २५६ रुग्ण उपचार घेत आहेत अशी डॉ. कोल्हे यांनी दिली.

बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सात्यत्याने आपला प्रयत्न सुरू असून केंद्राकडून त्यामागणी संदर्भात साकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नारायणगाव व खेड बायपास सुरू झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.