शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

आता हजार शाळांत भरणार ‘स्वप्नशाळा’

By admin | Updated: September 7, 2015 04:23 IST

‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही...

बापू बैलकर, पुणे‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही... होय, ही विद्यार्थ्यांच्या मनातील ‘स्वप्नशाळा’ (कृतियुक्त अध्ययन पद्धती) आता जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे. मुलं हसत-खेळत शिकतानाचे चित्र पाहावयास मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या वर्षात करण्यात येणार आहे.‘एबीएल’ (कृतीयुक्त अध्यक्षयन) ही एक सर्वसमावेशक, पूर्णपणे कृतीवर भर देणारी पद्धती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हायला वाव मिळतो, ज्ञानात भर पडते व सर्वांगीण विकासाला चालना मिळते. यामुळे शालाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी मदत होऊ शकते. विद्यार्थ्याला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, परीक्षेची भीती आपोआप नाहीशी होते.स्वत:च्या कुवतीनुसार प्रत्येक विद्यार्थी शिकतो. सामूहिक परीक्षा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन.पुस्तकांचे ओझे नाही. विद्यार्थी व शिक्षक दोघांच्या कृतिशीलतेला वाव. शिक्षकाची भूमिका विद्यार्थी घेत असल्याने शिक्षकांवरील ताण कमी होण्यास मदत.कोणीतीही क्षमता अप्राप्त राहत नाही. परीक्षेची भीती नाही, घोकंपट्टीला वाव नाही. कोणताही विद्यार्थी अमूकपेक्षा हुशार नाही किंवा अमूकपेक्षा मठ्ठ नाही, असे दर्शविता येत नाही.‘मी ऐकतो, मी विसरतो, मी पाहतो, मी लक्षात ठेवतो, मी स्वत: कृती करतो, मी पूर्ण ज्ञान मिळवतो’ यावर आधारित विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता कृतीवर आधारित व्यावहारिक शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने ‘कृतियुक्त अध्ययन’ हा विशेष कार्यक्रम सुरू केला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१०-११ पासून ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यास सुरुवात झाली. भोर तालुक्यातील ३० शाळांत प्रायोगिक तत्त्वावर तो राबविण्यात आला होता. पहिल्या वर्र्षापासूनच या उपक्रमाला यश येत आहे, असे पाहून ते इतर तालुक्यांतही राबविण्यास सुरुवात केली. नुकतीच जिल्ह्यात येऊन गेलेल्या पंचायत राज समितीनेही या उपक्रमाचे कौतुक केले असून, हा उपक्रम राज्यातही सुरू करण्याच्या सूचना करू, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता मोठ्या प्रमाणात तो राबविण्याचे ठरविले असून, या वर्षात १ हजार शाळांमध्ये ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ४) झालेल्या सर्वसाधारण सभेत यासाठीच्या वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात १ कोटी ३० लाखांचा निधी यासाठी देण्यात आला होता. आता यात आणखी ७० लाखांना मंजुरी मिळाली असून, आता यासाठी २ कोटी इतका निधी मिळणार आहे. यात शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने शिकणार आहेत. विशेष म्हणजे, यात परीक्षा (मूल्यमापन) घेतल्याचे मुलांना समजतच नाही. म्हणजे परीक्षेचे टेन्शन त्यांना येत नाही. नकळतपणे त्याचे मूल्यमानप होत असते. म्हणजे नापास होण्याचे टेन्शनही त्याला नसते.