शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

आता ‘बोडक्यां’च्या हातात सत्ता

By admin | Updated: November 14, 2015 02:55 IST

नगरपालिकांची स्थापना झाली तेव्हा कारभार पाहणाऱ्या मंडळींच्या डोक्यांवर फेटे होते. त्यानंतर टोपीवाल्यांचे राज्य आले.

बारामती : नगरपालिकांची स्थापना झाली तेव्हा कारभार पाहणाऱ्या मंडळींच्या डोक्यांवर फेटे होते. त्यानंतर टोपीवाल्यांचे राज्य आले. काळानुसार पेहराव बदलत असतो. फेटेवाले, टोपीवाले गेले, आता बोडक्यांच्या हातात सत्ता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ते नवीन प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.ते म्हणाले, बारामतीच्या जडणघडणीत त्या त्या वेळच्या मंडळींचे योगदान मोलाचे ठरले आहे. त्यामुळेच आपण नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष दिले नाही. कारण निवडणुका झाल्या, की त्या काळची मंडळी पुढील पाच वर्षे मतभेद न करता काम करीत, त्यामुळेच शहराचा विकास नियोजनबद्ध झाला आहे.बारामती पालिकेच्या निवडणुकीत कधी लक्ष घातले नाही. कारण या निवडणुकीत गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता, उमेदवार सढळ हाताने त्यांना अर्थपुरवठा करतात. उमेदवारांकडून घेणारेदेखील हात आखडता घेत नाहीत. त्यामुळे ‘जो येईल तो आपला’ या न्यायाने नगरपालिकेच्या निवडणुकांकडे पाहिले. आता प्रभाग पद्धतीमुळे चार उमेदवारांचे कमी अर्थकारण होत असेल, परंतु नगरपालिकेकडे अजून १२९ कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय भाव निघेल, हे आता बारामतीकरच ठरवतील, अशी टिप्पणी त्यांनी केली. या वेळी अजित पवार म्हणाले, बारामतीच्या विकासाचे कौतुक केंद्र व राज्यातील मंत्री करतात. तरीदेखील काही त्रुटी दाखवून टीका केली जाते. मात्र आम्ही काम करीत राहणार, बारामतीच्या हद्दवाढीसह जुन्या-नव्या बारामतीसाठी १३० कोटी रुपयांचा बृहत् पाणीपुरवठा योजनेसह अन्य पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला. उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)