शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

आता ‘बोडक्यां’च्या हातात सत्ता

By admin | Updated: November 14, 2015 02:55 IST

नगरपालिकांची स्थापना झाली तेव्हा कारभार पाहणाऱ्या मंडळींच्या डोक्यांवर फेटे होते. त्यानंतर टोपीवाल्यांचे राज्य आले.

बारामती : नगरपालिकांची स्थापना झाली तेव्हा कारभार पाहणाऱ्या मंडळींच्या डोक्यांवर फेटे होते. त्यानंतर टोपीवाल्यांचे राज्य आले. काळानुसार पेहराव बदलत असतो. फेटेवाले, टोपीवाले गेले, आता बोडक्यांच्या हातात सत्ता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ते नवीन प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.ते म्हणाले, बारामतीच्या जडणघडणीत त्या त्या वेळच्या मंडळींचे योगदान मोलाचे ठरले आहे. त्यामुळेच आपण नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष दिले नाही. कारण निवडणुका झाल्या, की त्या काळची मंडळी पुढील पाच वर्षे मतभेद न करता काम करीत, त्यामुळेच शहराचा विकास नियोजनबद्ध झाला आहे.बारामती पालिकेच्या निवडणुकीत कधी लक्ष घातले नाही. कारण या निवडणुकीत गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता, उमेदवार सढळ हाताने त्यांना अर्थपुरवठा करतात. उमेदवारांकडून घेणारेदेखील हात आखडता घेत नाहीत. त्यामुळे ‘जो येईल तो आपला’ या न्यायाने नगरपालिकेच्या निवडणुकांकडे पाहिले. आता प्रभाग पद्धतीमुळे चार उमेदवारांचे कमी अर्थकारण होत असेल, परंतु नगरपालिकेकडे अजून १२९ कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय भाव निघेल, हे आता बारामतीकरच ठरवतील, अशी टिप्पणी त्यांनी केली. या वेळी अजित पवार म्हणाले, बारामतीच्या विकासाचे कौतुक केंद्र व राज्यातील मंत्री करतात. तरीदेखील काही त्रुटी दाखवून टीका केली जाते. मात्र आम्ही काम करीत राहणार, बारामतीच्या हद्दवाढीसह जुन्या-नव्या बारामतीसाठी १३० कोटी रुपयांचा बृहत् पाणीपुरवठा योजनेसह अन्य पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला. उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)