शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
3
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
4
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
5
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
6
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
7
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
8
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
9
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
10
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
11
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
12
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
13
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
14
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
15
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
16
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
17
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
18
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
19
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
20
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं

भोर शहराला आता गढूळ पाणी

By admin | Updated: July 3, 2017 02:52 IST

नियोजनाअभावी भाटघर धरणातून भोर नगरपालिकेच्या दोनपैकी एका इन्टेकवेलला येणारे पाणी कमी पडत असल्याने दोन मोटर व्यवस्थित सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नियोजनाअभावी भाटघर धरणातून भोर नगरपालिकेच्या दोनपैकी एका इन्टेकवेलला येणारे पाणी कमी पडत असल्याने दोन मोटर व्यवस्थित सुरू राहत नाहीत. त्यामुळे एका महिन्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात एक फिल्टर प्लान्ट खराब झाल्याने चार दिवसांपासून निम्म्या शहराला गाळमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दर पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते.भाटघर धरणाच्या खाली १९७४ विहिरी काढून पहिली नळ-पाणीपुरवठा योजना करण्यात आली, तर १९९० मध्ये नवीन इंजिनघर बांधण्यात आले. ९० एचपीचे दोन व ५० एचपीचे दोन असे चार पंप असून त्यापैकी दोन पंपांनी पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज साधारणपणे २० लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र भाटघर धरणाच्या व्हॉल्व्हमधून पाणी सोडले जाते. मात्र या ठिकाणी भिंत नसल्याने ते पाणी विहिरीत न जाता नदीत जाते. त्यामुळे विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने पंप सुरळीत चालत नाहीत. त्यातच दोनपैकी एकच फिल्टर प्लान्ट सुरू व दुसरा बंद असल्याने निम्म्या भोर शहराला गाळमिश्रीत गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची भीती आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.शहरात नगरपालिकेने नवीन वितरण लाईन टाकली आहे. त्यामुळे उच्च दाबाने अधिक पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच विहिरीला कमी पाणी येत असल्याने पुरेशा प्रमाणात पंप चालत नाही.शहराला लागणारे पाणी अधिक प्रमाणात लागते, मात्र पालिकेची साठवणक्षमता कमी असल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.दोनपैकी एका फिल्टरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उपनगराध्यक्ष उमेश देशमुख यांनी सांगितले.मे ते आॅगस्ट हीच परिस्थितीनगरपालिकेच्या दुसऱ्या इन्टेकवेलला पाणी पुरावे म्हणून धरणाच्या व्हॉल्व्हमधून सोडलेले पाणी बांध घालून चारी काढून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अडवले आहे. मात्र तरीही पाणी येत नाही, त्यासाठी नदीपात्रात भिंत घालणे गरजेचे आहे, तरच पाणी पुरणार आहे. दरवर्षी उन्हाळ््यात धरणातील पाणी कमी पडले, की ही परिस्थती निर्माण होते. या वेळी पुन्हा धरणे भरून पाणी सोडेपर्यंत साधारणपणे मे ते आॅगस्ट महिन्यापर्यंत अशीच अवस्था असते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नगरपालिकेकडे कायमस्वरुपी कर्मचारी कमी असल्याने ७ ते ८ जणांना तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी घेतले आहेत. मात्र निधीअभावी अनेकदा या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते. यामुळे पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कमी पडतात. धरणातून भोर नगरपालिकेच्या विहिरीसाठी सोडलेल्या पाण्याचे नगरपालिकेकडून पाटबंधारे विभाग दर दोन महिन्याला साधारणपणे ३० हजारघेतले जातात. वर्षाला एक लाख ८० हजार रुपये घेतात, मग पाण्याचे योग्य नियोजन का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.नगरपालिकेच्या दोनपैकी एक फिल्टर नादुरुस्त असून त्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर शहराला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.- तृप्ती किरवे, नगराध्यक्षा