शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आंबेगावात आता प्रचाराची रणनीती

By admin | Updated: February 13, 2017 01:26 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मंचर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून नेत्यांना आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना, भाजपाकडून राज्यातील विद्यमान मंत्र्यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रसकडून माजी मंत्र्यांना प्रचारासाठी आाणण्याची तयारी करण्यात आली आहे.विशेषत: राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना या दोन पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत असेल. विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वच पक्ष करणार आहेत. प्रचारात त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत. प्रचारात नेत्यांच्या सभा आयोजित करून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तालुक्यात माघारीपूर्वीच प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. शिवसेनेने पेठ येथे उपनेते नितीन बानगुडे यांची सभा घेतली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रचारदौरे करणार असून प्रत्येक तालुक्यात त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पााटील, मंत्री विजय शिवतारे तसेच विश्वव्याख्याते शिवरत्न तोटे यांच्या प्रचाराच्या सभा घेणार आहे. भाजपाला तालुक्यात या निवडणुकीत ताकद दाखवायची आहे, म्हणून त्यांनी पेठ, मंचर, डिंभे भागात मंत्र्यांची सभा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पाालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच मंत्री विष्णू सावरा यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराची धुरा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे असून ते स्वत: ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. मात्र शक्य झाल्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी सांगितले.