शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

स्त्रियांच्या मैत्रीचे विविध पदर उलगडणारी कादंबरी (मंथन लेख २)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

जिला नाही ...तिच्यासाठी ते माहेर असावं! किती सुंदर शब्दांत एका स्त्रीच्या आयुष्यात मैत्री का महत्त्वाची आहे, हे लेखिका गौरी ...

जिला नाही ...तिच्यासाठी ते माहेर असावं!

किती सुंदर शब्दांत एका स्त्रीच्या आयुष्यात मैत्री का महत्त्वाची आहे, हे लेखिका गौरी नवरे यांनी मांडले आहे. मैत्रीवरच्या सुरेख कवितेनेच सुरू होणारी ही कादंबरी मैत्री कुठल्या पातळीवर घेऊन जाणार याची जाणीव करून देते. पुस्तक हातात घेतल्याघेतल्या मन प्रफुल्लित होतं, ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर पहिल्या दोन-चार पानांतच या मुखपृष्ठाचे महत्त्व लक्षात येते. त्यात वर्णन केलेली सगळ्यात महत्त्वाची वास्तू, हीच मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आली आहे. पिवळा रंग हा मैत्रीचा रंग मानला जातो आणि बरोब्बर तोच रंग मुखपृष्ठासाठी वापरलेला दिसून येतो. कथानकाच्या पात्रांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाच्या आणि त्यांच्या राहणीमानाच्या अनुषंगाने अभय बोरकर यांनी मुखपृष्ठ साकारले आहे.

कॉलेजमध्ये अनपेक्षितपणे घडलेल्या एका घटनेमुळे जवळ येत गेलेल्या या तिघी; तेजू, मनू आणि पीयू. स्वभावाने, विचाराने भिन्न तरीही एकमेकींच्या हाताला घट्ट धरून त्या आयुष्याचा प्रवास एकत्र करतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आलेल्या सुखात, दुःखात एकमेकींना साथ देताना त्या स्वतःपेक्षा बाकीच्या दोघींचा जास्त विचार करताना दिसतात. एकमेकींबद्दल कौतुक, अभिमान तर त्यांना आहेच पण वेळप्रसंगी कान धरून चुका दाखवायला पण त्या मागे-पुढे पाहत नाहीत.

नोकरीच्या, कामाच्या व्यापात गुंतल्यावरसुद्धा एकमेकींना वेळ देणे आणि प्रत्येक निर्णयात ‘आम्ही आहोत’ हे बाकीच्या दोघींनी कृतीतून दाखवून देणे हे या मैत्रीचे वैशिष्ट्य.

या मैत्रीतील भावलेली गोष्ट म्हणजे एकमेकींना तेवढेच स्वातंत्र्य देणे. कितीही चांगली मैत्री असली तरी आपले निर्णय एकमेकांवर ना? लादणे, दुसऱ्याचा निर्णय समजून घेऊन त्याचा आदर करणे हे किती महत्त्वाचे ना? एकमेकींच्या घरातले मृत्यू, प्रेमभंग असे अवघड प्रसंग पेलायला ही मैत्रीच त्यांचा आधारस्तंभ बनते, तर आनंदाच्या प्रसंगात तो बहरायलाही मैत्रीच हात पुढे करते. स्त्रीची मैत्री ही तिचा साथीदार कसा असेल यावर पुढे टिकते. इथे तिघींचे साथीदार त्यांना साथ देत त्यांची मैत्री समजून घेतात, हे खूप महत्त्वाचे आहे.

लेखिकेच्या सहज-साध्या शब्दांत ही कादंबरी विस्तारत असताना हिंदी गाण्यांची गुंफण पण सहजरीत्या केल्यासारखी वाटते. प्रत्येक प्रसंगानुसार केलेली गाण्यांची निवड अगदी समर्पक वाटते. तसेच इंग्रजी भाषेचा ओघवता वापर पण जाणवतो. आधुनिक काळातील तिघी म्हणून त्यांचे संवाद इंग्रजीमध्ये आवश्यक आहेत का? असे एखाद्याला वाटू शकते. पण मुंबईसारख्या शहराच्या पार्श्वभूमीवर रंगणारे कथानक, उच्चशिक्षित पात्र आणि आजच्या काळातलं एकूणच वातावरण या सगळ्याला तेही सहज वाटते.

४९० पानांचे पुस्तक ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नांत लिहिण्याचे शिवधनुष्य लेखिकेने नक्कीच यशस्वीरीत्या पेलले आहे. यामागे दांडगे वाचन, त्यामुळे आलेले भाषेवर असलेले प्रभुत्व जाणवते. लेखिकेची लेखन शैली अगदी आपल्या जवळची वाटते. पुस्तक वाचत असताना उत्सुकता तर वाढतेच आणि तिघींच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगात आपण कधी गुंतून जातो आणि त्या कधी आपल्या आजूबाजूलाच वावरत असल्याचा भास आपल्या मनात निर्माण होत जातो कळत नाही. ‘मी तुमच्या दोघींशिवाय जगू शकणार नाही,’ असं एकमेकींना सांगणाऱ्या या तिघींच्या आयुष्यात जर खरंच तसा प्रसंग उभा राहिला तर काय होईल?, हा प्रश्न त्यांच्या आसपासच्या लोकांनाच काय आपल्यालाही भेडसावून जातो. खरंच असं मैत्रिणींच्या बाबतीत होऊ शकतं का? जाणून घेण्यासाठी जरूर वाचा ‘त्या तिघी’. या कादंबरीत प्रत्येकाला आपले मैत्र सापडेल, अशी मला खात्री आहे.

अश्विनी काशीकर