शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सांडपाण्याच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा

By admin | Updated: June 12, 2016 05:56 IST

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीतील घाणीच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिले आहेत.

दौंड : येथील रेल्वे कुरकुंभ मोरीतील घाणीच्या संदर्भात ७ जणांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान ५ जुलै २0१६ रोजी नोटीसधारकांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र शासन, दौंड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे, तत्कालीन आरोग्य अधिकारी भानुदास भापकर, सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी ए. के. दुबे, रेल्वेचे अधिकारी सुमीत कुमार, रेल्वे रुग्णालयाचे डॉ. एन. के. सजीव, सेंट्रल रेल्वेचे आरोग्य अधिकारी डी. एन. जोशी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. दौंडच्या रेल्वे कुरकुंभ मोरीत सातत्याने गटारीतील सांडपाणी साचलेले असते तेव्हा या सांडपाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येते. तर बऱ्याचदा रेल्वे कुरकुंभ मोरीतून जाताना पादचारी, वाहनचालकांना याचा उपद्रव होतो. तसेच पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तेव्हा कुरकुंभ मोरीत पाणी साचले जाते. मात्र या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते आणि सांडपाण्याचा आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा कुरकुंभ मोरीतील सांडपाणी काढणे ही रेल्वेची जबाबदारी नाही, नगर परिषद म्हणते आमची जबाबदारी नाही, मग नेमके या सांडपाण्याला वाली कोण? असा प्रश्न भेडसावत असल्याने जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी दौंड न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा फौजदारी अर्ज नामंजूर करण्यात आला. याकामी अ‍ॅड. विलास बर्वे, अ‍ॅड. सचिन साने यांनी काम पाहिले होते.(वार्ताहर)उच्च न्यायालयात याचिका दाखलफौजदारी अर्ज नामंजूर झाल्याने यासंदर्भात न्याय मागण्यासाठी अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होऊन वरील व्यक्तींवर नोटिसा काढून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याकामी अ‍ॅड. अविनाश आव्हाड यांनी कामकाज पाहिले.