शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:11 IST

कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे.

पुणे : कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भरच पडणार असून, या व्यवसायासमोरील अडचणीत आणखी वाढ होईल. त्यामुळे सरसकट सर्वांना परवाना न देता बेरोजगारांना तो देण्यात यावा, त्याबाबतचे निकष ठरवावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी येथे केली.रिक्षाचालकांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना अर्ज आॅनलाइन भरण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर ही निदर्शने झाली. डॉ. आढाव म्हणाले, की रिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. ते चालवणाºया चालक आणि मालकाला अनेक प्रकारची बंधने आहेत. मागील दाराने आलेल्या कॉल अ कॅबला सरकारने मोकाट सोडले आहे. तर दुसरीकडे एकमेव संरक्षण कवच असलेले रिक्षा परवान्यांवरील नियंत्रणसुद्धा काढून घेतले आहे. आता अमर्याद परवाने वाटप करून रिक्षा व्यवसाय आणखी अडचणीत येणार आहे.परवाना वाटप करताना लोकसंख्या, रस्ते, सध्याची उपलब्ध वाहन सुविधा यानुसार नवीन परवाना वाटपाचे सूत्र ठरविले गेले पाहिजे. अन्यथा त्यामुळे शहराच्या वाहतूककोंडीमध्ये भर पडेल. मागेल त्याला परवाना, असे न करता त्यासाठी निकष ठरवावे.ज्याला नोकरी, व्यवसाय असेल त्याला परवाना देण्यात येऊ नये. त्यासाठी परवाना आधारक्रमांकाशी जोडावा, असे डॉ. आढाव यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांची भेटघेऊन त्यांना मागण्यांचे निवेदनदिले.