शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:11 IST

कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे.

पुणे : कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भरच पडणार असून, या व्यवसायासमोरील अडचणीत आणखी वाढ होईल. त्यामुळे सरसकट सर्वांना परवाना न देता बेरोजगारांना तो देण्यात यावा, त्याबाबतचे निकष ठरवावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी येथे केली.रिक्षाचालकांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना अर्ज आॅनलाइन भरण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर ही निदर्शने झाली. डॉ. आढाव म्हणाले, की रिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. ते चालवणाºया चालक आणि मालकाला अनेक प्रकारची बंधने आहेत. मागील दाराने आलेल्या कॉल अ कॅबला सरकारने मोकाट सोडले आहे. तर दुसरीकडे एकमेव संरक्षण कवच असलेले रिक्षा परवान्यांवरील नियंत्रणसुद्धा काढून घेतले आहे. आता अमर्याद परवाने वाटप करून रिक्षा व्यवसाय आणखी अडचणीत येणार आहे.परवाना वाटप करताना लोकसंख्या, रस्ते, सध्याची उपलब्ध वाहन सुविधा यानुसार नवीन परवाना वाटपाचे सूत्र ठरविले गेले पाहिजे. अन्यथा त्यामुळे शहराच्या वाहतूककोंडीमध्ये भर पडेल. मागेल त्याला परवाना, असे न करता त्यासाठी निकष ठरवावे.ज्याला नोकरी, व्यवसाय असेल त्याला परवाना देण्यात येऊ नये. त्यासाठी परवाना आधारक्रमांकाशी जोडावा, असे डॉ. आढाव यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांची भेटघेऊन त्यांना मागण्यांचे निवेदनदिले.