शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

अतिक्रमण कारवाई झालेल्यापैकी एक जणही बेघर होणार नाही : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : “दांडेकर पुल परिसरात गुरुवारी झालेली कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणे ...

पुणे : “दांडेकर पुल परिसरात गुरुवारी झालेली कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. अतिक्रमण कारवाई घाईने केली गेल्याचे माझे मत आहे. परंतु, अतिक्रमण कारवाई झालेल्यांपैकी एकही नागरिक बेघर होणार नाही, याची जबाबदारी महापालिकेतील सत्ताधारी म्हणून आम्ही घेतो,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांना सांगितले.

मोहोळ म्हणाले की, महापालिकेकडून ज्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई झाली तो भाग १९८७ च्या डीपीमध्ये सरळ दाखविला गेला होता. तो ८ मीटरचा असून ‘यू’ आकारात आहे. प्रत्यक्षात त्याची रूंदी २४ मीटर असणे अपेक्षित आहे. येथे आंबिल ओढ्याची रुंदी वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण या ‘यू’ आकारामुळे या भागातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाळ्यात नेहमी पाणी घुसत होते. येथील ओढा रुंदीकरण एक दिवस करावेच लागणार होते. परंतु, या भागातील नागरिकांना स्थलांतरित करताना त्यांना विश्वासात घेणे, योग्य समन्वय राखणे जरूरी होते.”

चौकट

मार्चमध्येच दिली होती नोटीस

“ओढ्यात अतिक्रमण असलेल्या १३० घरांशी महापालिकेचा संबंध आहे. दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढ्यातील अतिक्रमणाबाबत मार्च महिन्यातच संबंधितांना महापालिकेने जाहीर प्रकटनाव्दारे नोटीस पाठविली होती. परंतु, ती किती जणांनी वाचली हेही पाहणे जरूरी असल्याने नागरिकांना थोडासा वेळ देणे आवश्यक होते. नागरिकांनी या अतिक्रमण कारवाईला विरोध केला नव्हता. पण आज ज्याप्रकारे कारवाई झाली त्याला त्यांनी विरोध केला,” असे महापौर मोहोळ म्हणाले.

चौकट

हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई होईलच

“आंबिल ओढ्यातील रुंदीकरण करताना महापालिकेचा केवळ १३० घरांशी संबंध होता. त्यानुसार महापालिकेने नोटीसही पाठविली होती. काही नागरीक बिल्डरकडून नोटीस आल्याचे आज सांगत असले तरी त्या बिल्डरशी महापालिकेचा काही संबंध नाही. तो विषय इतर ६००/७०० घरांबाबतचा आहे. तरीही महापालिकेच्या कारवाईत कोणी हस्तक्षेप केला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

चौकट

ओढ्याचा प्रवाह सरळ करणे हाच हेतू

सप्टेंबर, २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला मोठा पूर आल्याने आजूबाजूचा मोठा परिसर बाधित झाला. मनुष्यहानी बरोबरच मोठ्याप्रमाणात वित्तहानीही या वेळी झाली. घरेच्या घरे वाहून गेली. आंबिल ओढ्याचा हा धोका लक्षात घेऊन एक ‘मास्टर प्लॅन’ तयार केला गेला. यात संपूर्ण ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण, सीमाभिंत बांधणे, कलव्हर्टची कामे करणे, अतिक्रमणे काढणे यासह दांडेकर पूल परिसरातील ओढ्याचा मूळ प्रवाह सरळ करणे ही कामे असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.