शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेचा असहकार

By admin | Updated: May 16, 2014 04:33 IST

नियोजनाचा अभाव व वाहनतळाची वानवा यामुळे लोणावळा शहरात निर्माण होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांचा आटापिटा चालला आहे.

लोणावळा : नियोजनाचा अभाव व वाहनतळाची वानवा यामुळे लोणावळा शहरात निर्माण होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांचा आटापिटा चालला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासन मात्र असहकाराच्या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे वाहतुक नियोजन करताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत असल्याचे दिसत आहे़ पर्यटनाचे मोठे केंद्र असलेल्या लोणावळा शहरात आठवडा सुटीच्या कालावधीमध्ये हजारो पर्यटक व वाहने येत असतात. यामुळे येथील वाहतुकीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे़ या वाहतूक कोंडीचा सर्वांधिक फटका सर्वसामान्य लोणावळेकरांना बसत आहे़ अगदी हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे़ वैद्यकीय सोयीसुविधा बाजारभागात असल्याने अनेक रुग्ण व नातेवाइकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, वाहतूक कोंडीमुळे वेळेत रुग्णालयात न पोहचल्याने रुग्ण दगावल्याच्या अथवा गंभीर त्रास झाल्याच्या घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत़ लोणावळेकरांना वाहतूक कोंडीमुळे होणारा रोजचा त्रास सोडविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात रुजू झालेले प्रभारी पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील यांनी वाहतूक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा हाती घेतला. नगर परिषदेने ठराव केल्याप्रमाणे मुख्य रस्ते व गल्ल्यांत एकेरी व दुहेरी वाहतूक, पार्किंग, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन, सम व विषम पार्किंग, वाहतुकीला अडथडा ठरणारी वाहने उचलण्यासाठी क्रेन आदी बाबी राबविणे, जागोजागी फ लक लावत जनजागृती करणे, पोलीस चौक्या उभारणे आदी कामे दोन महिन्यांपासून हाती घेतली आहेत़ वास्तविक नगर परिषदेने पोलीस प्रशासनाला झोन ठरवून देत फलक, रस्त्यांवर पट्टे मारुन देणे, जागोजागी पोलीस चौक्या उभारणे, वॉर्डन उपलब्ध करून देणे आदी कामे करणे अपेक्षित आहेत. मात्र, यापैकी एकाही कामात नगर परिषद पोलिसांना सहकार्य करत नसल्याने ही कामे करताना आॅन ड्युटी पोलीस व प्रभारी अधिकार्‍यांची दमछाक झाली आहे़ गवळीवाडा नाका परिसरात अनेक हॉटेल व चिक्कीची दुकाने असल्याने बहुतांश पर्यटक खरेदी व जेवणासाठी थांबतात़ या भागात नगर परिषदेचे एकही वाहनतळ नसल्याने पर्यटक सर्रासपणे रस्त्यांवर गाड्या उभ्या करून थांबतात. यामुळे गवळीवाडा परिसरात रोज सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक पोलीस या गाड्या पुढे न्यायला लावतात. यामुळे वाहनचालक, दुकानदार व वाहतूक पोलीस यांच्यात सतत खटके उडतात. हीच परिस्थिती बाजार भागात आहे. शहरात कोठेही वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने वाहने उभी करायची कोठे, असा प्रश्न उपस्थित करत पर्यटक व चालक गाड्या रस्त्यांवर उभ्या करतात़ शिवाजी पुतळा ते इंद्रायणी पूल हा मार्ग १ एप्रिलपासून एकेरी करण्यात आला ़ वाहतूक पोलीस चौकात उभे असतात तोपर्यंत लोणावळेकर देखील नियम पाळतो. मात्र, चौकातून पोलीस इतरत्र जाताच नियमांची पायमल्ली सुरू होते़ पार्किंग सुविधा नसल्यामुळे अगदी नगर परिषद इमारतीसमोर सुद्धा नो पार्किंगच्या जागेमध्ये सर्रास वाहने पार्क केली जात आहेत़ महिनाभरावर आलेल्या पावसाळ्यातही लाखो पर्यटक येतील. तेव्हा होणारी वाहतूक कोंडी योग्य प्रकारे सोडविण्यासाठी आताच नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी राजकीय मंडळी व नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ शक्य त्या रिकाम्या जागा नगर परिषदेने वाहनतळासाठी घेतल्यास वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)