शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

टोलही नको आणि भूखंडही!

By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST

शहरातील रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कराराने दिलेला जळोची येथील २२ एकराचा भूखंड परत मागण्याचा ठराव नगरपालिकेने केला आहे

बारामती : शहरातील रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कराराने दिलेला जळोची येथील २२ एकराचा भूखंड परत मागण्याचा ठराव नगरपालिकेने केला आहे. मात्र, टोलवेज कंपनीने कचरा डेपो आणि ढाकाळे येथील दोन्ही ठिकाणची जागा नको, शहरातील टोलनाके पूर्णपणे बंद करण्याची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र दिले आहे. सन २००३मध्ये शहरातील रिंगरोडसह अन्य रस्ते बांधणीसाठी रस्ते विकास महामंडळाला जळोची येथील भूखंड नगरपालिकेने दिला. रस्ते विकास महामंडळाने बारामती टोलवेज कंपनीकडे हा भूखंड कराराने हस्तांतरित केला. मात्र, या भूखंडावर आजपर्यंत कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. कचऱ्यापासून हरित कोळसा बनविण्याची योजना नगरपालिकेची ढाकाळे येथील २५ एकराच्या भूखंडावर आहे. ढाकाळे ग्रामस्थांनी या भूखंडावर कचऱ्याचा कोणताही प्रकल्प राबविण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बारामती टोलवेज कंपनीला शहरातील जळोची येथील भूखंड मिळण्यास अडचणी येत आहे. विशेष म्हणजे टोलवेजच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ढाकाळे येथील भूखंड खरेदी केला. तो नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी दिला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या भूखंडाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पथक पाठवले होते. या पथकाच्या अहवालावर पुढील निर्णय होणार आहे. वास्तविक ढाकाळेतील भूखंडदेखील जादा दराने घेतला. थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या भूखंडाची किंमत ठरवली तेव्हा कमी होती, परंतु त्यामध्ये नगरसेवकाने हस्तक्षेप केला. त्यामुळे किंमत वाढली. तरीदेखील कचऱ्याचा प्रश्न सुटेल, असे वाटल्याने टोलवेज कंपनीने ढाकाळेतील जमिनीचा व्यवहार केला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे तेथेही कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प तत्काळ सुरू होण्याची शक्यता नाही. याच पार्श्वभूमीवर जळोचीतील कचरा डेपोचा भूखंड देखील नको, अशीच भूमिका टोलवेजने घेतली आहे. त्यांनी शहरातील सर्व टोलनाके बंद करण्याची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र दिलेले आहे. आर्थिकदृष्ट्या शहरातील टोलनाके चालविण्यास परवडत नाहीत. चारचाकी गाड्या, एसटी बसला टोलमधून वगळले आहे. दुहेरी टोल आकारणीदेखील बंद केली आहे. त्यामुळे महिना अखेरीस सर्व खर्च जाऊन १ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यातूनही रस्ते दुरुस्तीसह अन्य कामे करणे भाग पडत असल्यामुळे बारामतीतील सर्व टोलनाके बंद करण्याची परवानगी मागण्यात आली. त्यामध्ये राजकारण येत आहे, बारामती टोलमुक्त झाल्यावर त्याचे श्रेय भाजपा सरकारला जाईल, या भीतीने त्यांच्या पत्रावर कोणताही निर्णय दिला जात नाही. (प्रतिनिधी)