शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

टोलही नको आणि भूखंडही!

By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST

शहरातील रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कराराने दिलेला जळोची येथील २२ एकराचा भूखंड परत मागण्याचा ठराव नगरपालिकेने केला आहे

बारामती : शहरातील रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कराराने दिलेला जळोची येथील २२ एकराचा भूखंड परत मागण्याचा ठराव नगरपालिकेने केला आहे. मात्र, टोलवेज कंपनीने कचरा डेपो आणि ढाकाळे येथील दोन्ही ठिकाणची जागा नको, शहरातील टोलनाके पूर्णपणे बंद करण्याची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र दिले आहे. सन २००३मध्ये शहरातील रिंगरोडसह अन्य रस्ते बांधणीसाठी रस्ते विकास महामंडळाला जळोची येथील भूखंड नगरपालिकेने दिला. रस्ते विकास महामंडळाने बारामती टोलवेज कंपनीकडे हा भूखंड कराराने हस्तांतरित केला. मात्र, या भूखंडावर आजपर्यंत कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. कचऱ्यापासून हरित कोळसा बनविण्याची योजना नगरपालिकेची ढाकाळे येथील २५ एकराच्या भूखंडावर आहे. ढाकाळे ग्रामस्थांनी या भूखंडावर कचऱ्याचा कोणताही प्रकल्प राबविण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बारामती टोलवेज कंपनीला शहरातील जळोची येथील भूखंड मिळण्यास अडचणी येत आहे. विशेष म्हणजे टोलवेजच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ढाकाळे येथील भूखंड खरेदी केला. तो नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी दिला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या भूखंडाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पथक पाठवले होते. या पथकाच्या अहवालावर पुढील निर्णय होणार आहे. वास्तविक ढाकाळेतील भूखंडदेखील जादा दराने घेतला. थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या भूखंडाची किंमत ठरवली तेव्हा कमी होती, परंतु त्यामध्ये नगरसेवकाने हस्तक्षेप केला. त्यामुळे किंमत वाढली. तरीदेखील कचऱ्याचा प्रश्न सुटेल, असे वाटल्याने टोलवेज कंपनीने ढाकाळेतील जमिनीचा व्यवहार केला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे तेथेही कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प तत्काळ सुरू होण्याची शक्यता नाही. याच पार्श्वभूमीवर जळोचीतील कचरा डेपोचा भूखंड देखील नको, अशीच भूमिका टोलवेजने घेतली आहे. त्यांनी शहरातील सर्व टोलनाके बंद करण्याची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र दिलेले आहे. आर्थिकदृष्ट्या शहरातील टोलनाके चालविण्यास परवडत नाहीत. चारचाकी गाड्या, एसटी बसला टोलमधून वगळले आहे. दुहेरी टोल आकारणीदेखील बंद केली आहे. त्यामुळे महिना अखेरीस सर्व खर्च जाऊन १ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यातूनही रस्ते दुरुस्तीसह अन्य कामे करणे भाग पडत असल्यामुळे बारामतीतील सर्व टोलनाके बंद करण्याची परवानगी मागण्यात आली. त्यामध्ये राजकारण येत आहे, बारामती टोलमुक्त झाल्यावर त्याचे श्रेय भाजपा सरकारला जाईल, या भीतीने त्यांच्या पत्रावर कोणताही निर्णय दिला जात नाही. (प्रतिनिधी)